महाराष्ट्र साधुसंतांच्या विचारांची भूमी – उद्योजक आकाश बाफना आकाश बाफना यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

0
312

जामखेड न्युज—–

महाराष्ट्र साधुसंतांच्या विचारांची भूमी – उद्योजक आकाश बाफना

आकाश बाफना यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

“महाराष्ट्र ही साधुसंतांच्या विचारांची भूमी, छत्रपतींची कर्मभूमी आणि महामानवांच्या संघर्षाची भूमी आहे,” असे प्रतिपादन युवा उद्योजक आणि बाफना उद्योग समूहाचे संचालक आकाश दिलीप बाफना यांनी केले.

जामखेड शहरातील तक्षशिला प्रायमरी स्कूल व एकलव्य बाल संस्कार केंद्र (बालवाडी) येथे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त युवा उद्योजक तथा बाफना उद्योग समूहाचे संचालक आकाश दिलीप बाफना यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले.यावेळी ते बोलत होते.

वर्षभर अभ्यास करुन नर्सरी ते चौथी पर्यंत प्रत्येकी १ ते ४ गुणाक्रमांक आलेल्या तसेच मंथन परीक्षेस राज्य ,जिल्हा व तालुका क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बाफना उद्योग समूहाचे संचालक आकाश दिलीप बाफना , अशोक वीर, धनराज पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुणपत्रक सन्मानचिन्ह ,शैक्षणिक साहित्य व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

पुढे बोलताना बाफना म्हणाले, “शाळेत विद्यार्थ्यांवर घडवलेले संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता यामुळेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी पूर्ण वेळ देत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मेहनतीचे फलित विद्यार्थ्यांच्या शिस्तशीर आणि उत्स्फूर्त सहभागातून दिसून येते. पुढील काळात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.

यावेळी बोलताना मुख्याध्यापक अशोक जावळे म्हणाले की,आकाश बाफना यांनी अल्पावधीत आपल्या उद्योग समूहाचे नाव राज्यभरात प्रसिद्ध केले. त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मंथन राज्यस्तरीय परीक्षेत जामखेड तालुक्यातील ६ केंद्रांवर ४५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. ही परीक्षा राज्यातील अडीच लाख विद्यार्थी देतात. २०१३ पासून ही स्पर्धा सातत्याने घेतली जात असून, यशस्वी विद्यार्थ्यांचा लवकरच सत्कार सोहळा होणार आहे.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक वीर, दैनिक सुर्योदयचे उपसंपादक धनराज पवार, मुख्याध्यापक अशोक जावळे, अध्यक्ष अशोक आजबे,उपाध्यक्ष अविनाश जावळे, संचालक प्रल्हाद जावळे, पालक संदीप कचरे, श्रीमती फुले मॅडम, श्रीमती बेंद्रे मॅडम, श्रीमती ढोले मॅडम, श्रीमती नागरगोजे मॅडम, श्रीमती काळे मॅडम, श्रीमती तवटे मॅडम,श्रीमती निगुडे मॅडम,श्रीमती पोकळे मॅडम, श्रीमती गायकवाड मॅडम,खराडे मावशी तसेच पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अशोक जावळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here