जामखेड न्युज – – – –
“ज्यांच्या हातात कुदळ-फावडे, त्यांच्या हातात लेखणी द्या” हा विचार राबविणारे
सामाजिक क्रांतीचे प्रणेते – राजर्षी छत्रपती शाहू महाराज

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा
जन्म कागलच्या घाटगे घराण्यात झाला मूळ नाव यशवंतराव होते वयाच्या १० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानचे दत्तक राजे म्हणून राज्याभिषेक झाला नाव झाले छत्रपती शाहू महाराज. राजकोट व धारवाड येथे शिक्षण. ब्रिटिश अधिकारी सर फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक विचारांची जडणघडण झाली. सत्यशोधक चळवळीचा प्रभाव पडला.

२. राज्यकारभाराची सूत्रे – १८९४
वयाच्या २० व्या वर्षी प्रत्यक्ष कारभार हाती घेतला. “राजा हा रयतेचा सेवक आहे” हे सूत्र मानून राज्य केले.
३. सामाजिक क्रांतीचे निर्णय
अ) शिक्षण क्षेत्रातील क्रांती
1. १९०२ – मागासवर्गीयांसाठी ५०% आरक्षण :भारतात पहिल्यांदाच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू केले. “ज्यांच्या हातात कुदळ-फावडे, त्यांच्या हातात लेखणी द्या” हा विचार दिला.
2. मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण : १९१७ साली संस्थानात कायदा करून शिक्षण सक्तीचे केले. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन.
3. वसतिगृहे सुरू केली : अस्पृश्य, मुस्लिम, जैन, लिंगायत अशा सर्व जाती-धर्मांसाठी स्वतंत्र वसतिगृहे काढली. ‘मिस क्लार्क होस्टेल’, ‘व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग’ प्रसिद्ध.

ब) सामाजिक समतेचे कायदे
1. १८९९ – आंतरजातीय विवाह कायदा : भारतातील पहिला कायदा.
2. १९१८ – अस्पृश्यता निवारण : सार्वजनिक विहिरी, शाळा, कचेऱ्या अस्पृश्यांसाठी खुल्या केल्या. वतनदारी नष्ट केली.
3. १९१९ – ‘वेदोक्त प्रकरण’ : सत्यशोधकी ब्राह्मण पुरोहितांकडून क्षत्रियांचे धार्मिक विधी करण्याचा अधिकार मिळवून दिला. कर्मकांडावरील ब्राह्मणांची मक्तेदारी मोडली.
4. ‘पाटीलकी-देशमुखी’ मोडली : वंशपरंपरागत वतने बंद करून गुणवत्तेवर नेमणुका सुरू केल्या.


