जामखेड न्युज——
स्पर्धेत टिकण्यासाठी संस्कार, जिद्द व संयम महत्त्वाचा – सपोनि अनिल भारती
श्री. साकेश्वर विद्यालयात सदिच्छा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न
सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी संस्कार व जिद्द महत्त्वाची आहे. हे संस्कार व जिद्द विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकच निर्माण करू शकतात. यातून संयम निर्माण होतो व स्पर्धेत यशस्वी होता येते असे मत जामखेडचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती यांनी व्यक्त केले.
श्री साकेश्वर विद्यालयात इयत्ता दहावीचा सदिच्छा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, जामखेडचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती, प्राचार्य श्रीकांत होशिंग,
डॉ. भगवान मुरूमकर, संजय वराट, माजी चेअरमन व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वीय साहाय्यक प्रा. अरूण वराट, चेअरमन कैलास वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, ज्ञानदेव मुरूमकर, व्हाइस चेअरमन दादासाहेब नेमाने, प्राचार्य दादासाहेब मोहिते, बाळासाहेब वराट, पोलीस पाटील महादेव वराट, संतोष देशमुख,
अभिषेक पाटील, सचिन मुरूमकर, कांचन निकाळजे, शिवचंद वराट, रामचंद्र वराट गुरूजी, प्रभु वराट गुरूजी, गोपाळ नेमाने, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर,आश्रू सरोदे यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
इयत्ता दहावीत 2020,21,22 मध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेल्या गुणवंत विदयार्थी, गणित विज्ञान प्रदर्शनात यश संपादन केलेले विद्यार्थी, शिक्षक, चित्रकला स्पर्धेत, मैदानी क्रीडा प्रकारात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी दहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेसाठी मिटींग टेबल भेट दिला, तसेच हराळे भाऊसाहेब यांनी शाळेसाठी दोन कपाट व खुर्ची भेट दिली.
यावेळी राधिका वराट, दिपाली वराट, या इयत्ता दहावीत विद्यार्थींनीनी आपली मनोगते व्यक्त केली. यानंतर चेअरमन कैलास वराट, प्राचार्य दादासाहेब मोहिते, सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, संजय वराट, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उद्धव (बापू) देशमुख, शशिकांत देशमुख यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
यावेळी बोलताना भारती म्हणाले की, कोणतेही काम लक्षपूर्वक करा, यश तुमच्याच हातात आहे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार होण्यासाठी भरपूर वाचन करा “वाचाल तर वाचाल” जीवन खुप सुंदर आहे याचा आनंद घ्या असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम वराट, अर्जुन रासकर यांनी तर आभार अशोक घोलप यांनी मानले.