जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे नियमानुसारच काम होणार अतिक्रमणे निघणार? – उपमुख्यमंत्री अजित पवार जामखेडच्या प्रलंबित प्रश्नाबाबत महेश निमोणकर यांनी वेधले लक्ष
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे नियमानुसारचकाम होणार अतिक्रमणे निघणार? – उपमुख्यमंत्री अजित पवार
जामखेडच्या प्रलंबित प्रश्नाबाबत महेश निमोणकर यांनी वेधले लक्ष
गेल्या अनेक दिवसांपासून जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग रखडलेला आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांना लवकरात लवकर रिपोर्ट करावयास सांगितले अतिक्रमणे का निघत नाहीत काय अडचण आहे, ठेकेदार का लवकर काम करत नाही यासाठी वेळप्रसंगी मी नितीन गडकरी साहेबांशी बोलेल व लवकरात लवकर रस्ता पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे अजित पवार म्हणाले. मी रस्त्यांची कामं करण्यासाठी वेळप्रसंगी लोकांशी वाईटपणा घेतला. काही जणांची घर काढावीलागल्याचे पवार यांनी सांगितले.
जामखेड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते यावेळीमाजी आमदार लहू कानडे, युवक प्रदेशाध्यक्ष धीरज शर्मा, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, उमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ, तालुकाध्यक्ष महेश निमोणकर बाळासाहेब शिंदे, शरद नवले, बाळासाहेब नाहटाराजेंद्र गुंड, प्रशांत शेलार, बापुराव शिंदे, धिरज पाटील, कपील पवार, भगवान पाचपुते, ऋषिकेश शेलार, नंदुरबार मुंडे, सुरज रसाळ, अक्षय शिंदे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अनेक पक्ष प्रवेश झाले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित अहिल्यानगर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, जामखेड मध्ये माजी नगरसेवक राजू ओव्हळ, शामीर सय्यद, शिवसेना शहरप्रमुख गणेश काळे, कृष्णा गाडे, अजित रेडे,यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाला.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष महेश निमोणकर म्हणाले की, अजित दादा शब्दाला जागणारे नेते आहेत. आज जामखेड पवित्र झाले आहे. मतदारसंघासाठी कुकडीचे पाणी, एमआयडीसी, पाणीपुरवठा योजना याबाबत लक्ष घालावे व कर्जत जामखेड साठी आशिर्वाद हवा असे निमोणकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, रोहित माझ्यासोबत असताना मी किती कोटींचा निधी दिला याची माहिती घ्या काम करताना उन्हे धुणे काढू नका आपापले काम करा, जनताच आपल्या कामाचे मूल्यमापन करत असते. माझ्या समोर सर्व कार्यकर्ते समान आहेत. मी कधीही भेदभाव करत नाही. मी नेहमीच बेरजेचे राजकारण करतो वजाबाकी चे नाही यावेळी त्यांनी भारतीय हवामान खात्याचा समाचार घेतला पाश्चात्य देश व भारत तुलना केली. पाश्चात्य देशात हवामान खात्याने सांगितले की त्या वेळी पाऊस येतोच भारतात मात्र उलटे होते.
अहिल्यानगरच्या कारखान्यांची काय अवस्था आहे?
अहिल्यानगरच्या कारखान्यांची काय अवस्था आहे? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. मी कारखान्यांची नावं घेणार नाही. नाहीतर काही लोक फोन करुन म्हणतील जामखेडच्या भाषणात आमच्या कारखान्याचं कशाला काढलं? पण जनतेने कारखाना, जिल्हा बँक, सोसायट्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे. अनेक संस्थांची वाईट परिस्थिती झाली आहे. बारामतीचा विकास काही उगीच झालेला नाही. कामं करावी लागतात असे अजित पवार म्हणाले. जामखेडमधील रखडलेल्या रस्त्यासाठी मी वेळप्रसंगी नितीन गडकरी साहेबांशी बोलेल असे अजित पवार म्हणाले. मी रस्त्यांची कामं करण्यासाठी वेळप्रसंगी लोकांशी वाईटपणा घेतला. काही जणांची घर काढावी लागल्याचे अजित पवार म्हणाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला शोभेल असे स्मारक उभारणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला शोभेल असे स्मारक अहिल्यानगर जिल्ह्यात उभारणार असल्याचे अजित पवार म्हणाले. अर्थ खातं आपल्याकडे असल्यानं या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असे अजित पवार म्हणाले. आपल्याला काम अत्यंत चोख केलेलं लागत असेही ते म्हणाले.
जो माणूस योग्य दिशेने कामं करतो त्याच्या मागे उभं राहा
वाद घालून कुणाचं भल झालेलं नाही. जो माणूस योग्य दिशेने कामं करतो त्याच्या मागे उभं राहा असे अजित पवार म्हणाले. मी कधीही कुणावर टीका करत नाही. जनतेने त्यांचं काम केलं आहे, लाडक्या बहिणीने आमचं काम केलं आहे असे अजित पवार म्हणाले. त्यामुळं वाद करत बसू नका, असे अजित पवार म्हणाले. आमच्या मतदारसंघातील कामाकडे माझे बारीक लक्ष असते. बारामतीतील इमारती कशा आहेत? ते उगीच नाही. जनतेला माझी विनंती आहे की जात धर्म प्रांत यावरून समाजात तेढ निर्माण होऊ देऊ नका असे अजित पवार म्हणाले. आपल्या घरात आलेल्या लेकी बाळीना सांगा एक किंवा दोन आपत्यवर थांबा. नाहीतर ब्रम्हदेव आला तरी भविष्यात पाणी पुरणार नाही असे अजित पवार म्हणाले.