जामखेड चा प्रारूप विकास आराखडा नव्याने होणार जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीला मोठे यश

0
1628

जामखेड न्युज——–

जामखेड चा प्रारूप विकास आराखडा नव्याने होणार

जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीला मोठे यश

 

जामखेड प्रारूप विकास आराखड्याबाबत सुनावणी दरम्यान 465 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या
यासाठी जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने यास आवाहन देण्यात आले होते. यानुसार आज प्रस्तावित सदोष’अ’ प्रारूप विकास आराखडा रद्द करून नव्याने तयार करणे बाबत अधिसूचना कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन धैर्यशील पाटील यांनी आदेश काढला आहे.

आज जामखेड प्रारूप विकास बचाव कृती आराखडा यांच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे प्रा. मधुकर आबा राळेभात (अध्यक्ष), आकाश दिलीप शेठ बाफना (कार्याध्यक्ष), अमित अरुणशेठ चिंतामणी (उपाध्यक्ष), विनायक विठ्ठलराव राऊत (सचिव),  राहुल अंकुश उगले (सहसचिव), अविनाश दशरथ साळुंके (खजिनदार), सन्मानीय सदस्य अशोक जावळे, डॉ.संजय राऊत, मोहन पवार हे जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीतील सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना सर्वच सदस्यांनी प्रारूप विकास आराखडा रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच विकास आराखडा बचाव समितीला मदत करणारे आमदार प्रा राम शिंदे यांचे आभार मानले.

प्रारूप आराखडयाची नोटीस दिले पासून तो आराखडा दोन वर्षात व्हावा हा नियम आहे. तो नियम डावलून पाच वर्षांनंतर आराखडा तयार करणे हेच नियम बाह्य आहे. गेल्या चारवर्षापासून नगरपालिका प्रशासक चालवत आहेत. याच काळात प्रारूप आराखडा तयार केला आहे. ही प्रक्रियानगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २३ मधील नियमातील तरतुदीचा भंग करणारी आहे. तसेच तो करताना शहराच्या विकासाचा व नुकसानीचा योग्य विचार केलेला नाही. असे म्हटले आहे.

आज जामखेड प्रारूप विकास बचाव कृती आराखडा यांच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे प्रा. मधुकर आबा राळेभात (अध्यक्ष), आकाश दिलीप शेठ बाफना (कार्याध्यक्ष), अमित अरुणशेठ चिंतामणी (उपाध्यक्ष), विनायक विठ्ठलराव राऊत
(सचिव), राहुल अंकुश उगले (सहसचिव), अविनाश दशरथ साळुंके (खजिनदार), सन्मानीय सदस्य अशोक जावळे, डॉ.संजय राऊत हे जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीतील सदस्य उपस्थित होते.

नियोजन समिती तज्ञ सदस्य नावे पुढीलप्रमाणे होते.
संतोष दत्तात्रय धोंगडे- सहायक संचालक, नगर रचना (सेवानिवृत्त) नगर, अनंत त्र्यंबक धामणे –
रचना (सेवानिवृत्त) नगर, किरण रामचंद्र वाघे – परवाना धारक अभियंता, नितीन पाटील प्रशासक – प्रशासक, जामखेड नगरपरिषद तथा उपविभागीय अधिकारी, कर्जत भाग, कर्जत हे होते. 

जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले होते की, जामखेड शहराची लोकसंख्या साठ हजाराचे वर आहे. जामखेड शहाराला पाणीपुरवठा उजनी “धरणातून पुढील पन्नास वर्षाचा विचार करून केला आहे. परंतु त्याप्रमाणे शहराचा रिंगरोड हा गावालगत राहत्या घरावरून, बंगल्यावरून जाणारा नुकसानीचा प्रस्तावित केला आहे. ज्यामुळे पालिकेवर आर्थिक भूरदंड वाढणार आहे. नगर पालिकेच्या हद्दीचा विचार करता रिंगरोड शहराच्या मध्यापासून कमीत कमी २.५ कि.मी. असावा ज्यातून लोकांच्या घराचे नुकसान होणारा नाही व शहर विस्ताराला जागा उपलब्ध हाईल. आजच शहराचा विस्तार मध्यापासून १.५ कि.मी.एवढा आहे. शहराला रिंगरोड दिला असतानाही राज्य रस्ता व राष्ट्रीय महामार्ग यांच्या रूंदी वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. तो शहर विद्रुपीकरण करणारा व व्यावसायिकांचे व्यवसाय पुर्णत: बंद करणारा नुकसानकारक आहे. जागा आरक्षण टाकताना मनमानी केली असून ज्यातून ठराविक लोकांना आर्थिक कमाई करता येईल अशापध्दतीने आरक्षण टाकले आहे.तरी हा आराखडा रद्द करून लोक नियुक्त नगर परिषद पदाधिकारी निवडून आले नंतर शहरविकास आराखडा तयार करावा असे पत्रात म्हटले आहे. यामुळे आज बचाव कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री व आमदार प्रा राम शिंदे यांचे आभार मानले. 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here