स्त्री हे शक्तीचे रूप – रोहणीताई काशिद जामखेडमध्ये जागर स्त्रीशक्तीचा कार्यक्रम उत्साहात साजरा

0
364

जामखेड न्युज——

स्त्री हे शक्तीचे रूप – रोहणीताई काशिद

जामखेडमध्ये जागर स्त्रीशक्तीचा कार्यक्रम उत्साहात साजरा

 

स्त्री हे शक्तीचे रूप आहे. स्त्रीच्या कामाचे महत्व समाजाला समजतं नाही. शिक्षण आणि धाडसीपणा हे गुण प्रत्येक मुलीमध्ये असलेच पाहिजे. त्याशिवाय देव, धर्म व देशहिताचे कार्य घडू शकत नाही असे मत शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई संजय काशीद यांनी व्यक्त केले.

नवरात्रोत्सवानिमित्त महिला शिवजन्मोत्सव समिती, मार्फत जामखेड शहरात संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली जागर स्त्री शक्तीचा हा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला. यामध्ये घोडे मावळे, ढोल पथक, हलगी पथक,लाठी काठी, गरबा नृत्य तसेच भव्य अशी वाहन रॅली आयोजित करण्यात आली होती. शहरातील शेकडो तरुणी, महिला यांनी या उत्सवात सक्रिय सहभाग घेतला. उपस्थित प्रत्येक महिलेला यावेळी भगवा फेटा बांधण्यात आला.

यावेळी या आधुनिक काळात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये आदर्श गाव सारोळा च्या सरपंच सौ. ऋतुताई अजय काशीद, डॉ.सौ. प्रियंका प्रताप चौरे, सौ.कामिनीताई राजगुरू, गीता येवले सारिका जमदाडे विद्या भोसले वैशाली मुरूमकर सुनिता ताई बोराटे, वैशाली शिंदे, वैशाली शिंदे, कामिनीताई राजगुरू मॅडम, डॉक्टर प्रियंका ताई चौरे, लक्ष्मी पवार, मयुरी काटे यांच्या सह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. यावेळी खास उपस्थिती
श्रीमती आशाताई राम शिंदे यांची रॅलीदरम्यान सहभाग नोंदवला व सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

आरतीसाठी अजय काशिद, शरद कार्ले , पांडुरंग उबाळे, बाजीराव गोपळघरे, बबलू टेकाळे, अजय गौड, पप्पू काशिद, किशोर काळे, आविराज बेलेकर, सुनिल यादव यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या आयोजिका तथा महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई संजय काशीद यांनी आपल्या प्रस्ताविकातून महिषासूराचा वध करण्याचे सामर्थ्य कुठल्याच देवता मध्ये नव्हते. तेव्हा शक्तीने आई दुर्गेच्या रूपात अवतार घेऊन त्या राक्षसाचा वध केला. स्त्रियांनी स्वतःला ओळखलं पाहिजे. स्त्री हे शक्तीचे रूप आहे. स्त्रीच्या कामाचे महत्व समाजाला समजतं नाही. शिक्षण आणि धाडसीपणा हे गुण प्रत्येक मुलीमध्ये असलेच पाहिजे. त्याशिवाय देव, धर्म व देशहिताचे कार्य घडू शकत नाही असे सांगितलं.

यावेळी बोलताना शिक्षण विभागात कार्यरत कामिनीताई राजगुरू मॅडम यांनी आजच्या बदलत्या युगात महिलांना स्व संरक्षणाचे धडे घेण्याची गरज आहे. आज समाजात स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आहेत. ते सहन करता लढायला शिकल पाहिजे असे मत मांडले.

शेवटी अकरा वर्षाच्या आतील सर्व कन्याकुमारींचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच या कुमारिकांना आकर्षक भेटवस्तुही देण्यात आल्या. शेवटी उपस्थित सर्वांना महाप्रसाद देण्यात आला.सुंदर असे गरबानृत्याने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.

हा उत्सव यशस्वी करण्यासाठी जामखेड मधील या महिलांनी तसेच यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here