शिक्षक भरतीसाठीच भावी शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू राज्यातील अनेक शाळेत लाखो जागा रिक्त, शिक्षक भरती करण्याचे शासनाचे धोरण हवेत शिक्षकांविना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

0
492

जामखेड न्युज——

शिक्षक भरतीसाठीच भावी शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

राज्यातील अनेक शाळेत लाखो जागा रिक्त, शिक्षक भरती करण्याचे शासनाचे धोरण हवेत

शिक्षकांविना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

 

सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने सरकार अनेक लाभाच्या योजना जाहीर करत आहे. लाडकी बहिण, वयोश्री योजना अशा कितीतरी योजना आहेत पण राज्यात अनेक पात्रता धारक सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत यांच्या साठी शासनाकडे कसलीही योजना नाही. राज्यात लाखो शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीच्या आशेवर आहेत. अनेक अभियोगता धारक बेरोजगार आहेत.

शासनाने शिक्षक भरती बाबत वेळोवेळी आश्वासन दिली पन्नास हजार शिक्षक भरती दोन टप्प्यात असे शिक्षण मंत्री व सरकारने यांनी घोषणा केली परंतु आपल्या घोषणेप्रमाणे शासनाला शिक्षक भरती करायला वेळ नाही दुसऱ्या बाजूला योजनांचा पाऊस पडत असताना शाळांना शिक्षक नाहीत आणि बेरोजगार तरुणांना नोकऱ्या नाहीत.

 

आपल्यावरील या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बेरोजगार युवक – युवती, शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे या ठिकाणी दिनांक २० ऑगस्ट, २०२४ पासून शिक्षक भरती फेज – २ ची कार्यवाही तात्काळ सुरु होण्यासाठी पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत गोरगरीब- गरजू, बेरोजगार शिक्षक तरुणांना शासनाच्या आश्वासनानुसार शिक्षक पदाच्या नोकऱ्या मिळाव्यात, तसेच शाळेला आणि विद्यार्थ्यांना पात्र शिक्षक मिळावेत यासाठी आमचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.

ऊन, वारा, पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता महिला, युवक मोठ्या प्रमाणावर विविध जिल्ह्यांतून या आंदोलनात सहभागी होत आहेत. गेल्या ९ दिवसात शासनाने आमच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. म्हणूनच आता नाईलाजाने शासनाचे या बेरोजगार शिक्षक अभियोग्यता धाकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व न्यायिक मागण्या मान्य होण्यासाठी सोमवार दिनांक २६ ऑगस्ट, २०२४ पासून बेमुदत अन्नत्याग/ आमरण उपोषण सुरू केलें आहे. सदर उपोषणकर्त्यांच्या जीविताचा आणि भवितव्याचा विषय शासन प्रशासनाच्या सहानुभूतीपूर्वक निर्णयावर सोपवला आहे.

त्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या आंदोलन उपोषणकर्त्यांनी शासनाच्या विरोधात बेरोजगार शिक्षक युवक- युवती अगतिक होऊन अगदी नाईलाजाने बेमुदत अन्नत्याग/ आमरण उपोषणाच्या मार्गाचा अवलंब संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू करुन त्यांच्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. बेरोजगार अभियोग्यताधारकांच्या मागण्यांचा शासनाने अत्यंत संवेदनशिलतेने विचार करून शिक्षक भरती सुरू करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

चौकट-
अन्नत्याग/ आमरण उपोषण करणारे बेरोजगार शिक्षक:-
१) तुषार देशमुख, पत्ता:- मु. पोस्ट तळणी, ता.हदगाव
जिल्हा नांदेड.
२) प्रीती कालिदास हत्ते, पत्ता – मु. पो. किणी, तालुका – अक्कलकोट,
जिल्हा- सोलापूर.
३) रोहिणी कुंडलिकराव काळे, पत्ता :- मु. पोस्ट दाणेवाडी, ता. श्रिगोंदा,
जिल्हा- अहमदगर.
४) अनिता एकनाथ हाडावळे, पत्ता:- मु. पोस्ट, मंचर, तालुका- आंबेगाव, जिल्हा- पुणे.
५) भगवान डोहिफोडे, पत्ता:- मु. डोहिफोडे वाडी, पोस्ट- सिनगाव, ता. देउळगाव राजा, जिल्हा- बुलढाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here