दहावीच्या परीक्षेत राज्यात २११ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण

0
276

जामखेड न्युज——

दहावीच्या परीक्षेत राज्यात २११ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण

काल जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यात १०० टक्के मिळवलेले विद्यार्थी २११ आहेत. त्यात पुण्यात १३, नागपूरमध्ये ३, संभाजीनगर ४०, मुंबई ८, कोल्हापूर १२, अमरावती ११, नाशिक २, लातूर ११३, कोकणात ९ विद्यार्थी आहेत.

उद्यापासून १४ मे पासून २८ मे पर्यंत गुण पडताळणी करता येईल. मंडळाकडे अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करता येईल. फि भरावी लागते. गुण पडताळणीसाठी एका विषयासाठी ५० रुपये भरावे लागणार आहे.

जिल्हानिहाय सर्वाधिक निकाल. सिंधुदुर्ग ९९.३२ टक्के. जिल्हानिहाय सर्वात कमी निकाल. गडचिरोली ८३.६७ टक्के. सर्व विभागात कोकण विभागाने बाजी मारली आहे. ९८.२८ टक्के निकाल. सर्वात कमी निकाल नागपूर ९०.७८ टक्के.

एकूण २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले. कुठल्या विभागात असे किती विद्यार्थी आहेत ते जाणून घ्या. पुणे ५९, नागपूर ६३, संभाजी नगर २८, मुंबई ६७, कोल्हापूर १३, अमरावती २८, नाशिक ९, लातूर १८.

४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. म्हणजे ६० किंवा त्याहून अधिक टक्केवारी असलेले. पण ७५ टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी. ३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले. ४५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आणि ६० टक्के पेक्षा कमी मार्क घेतलेले विद्यार्थी. १ लाख ८ हजार ७८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांना ३५ टक्क्याहून अधिक ते ४५ टक्क्यांपेक्षा कमी मार्कस मिळाले.

यंदा इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान झाली. १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी पास झाले. यंदा उर्तीण होणाऱ्या विद्यार्थ्यांच प्रमाण ९४.१० टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here