Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या कोरोना रूग्ण संख्या नियंत्रण असणार्‍या भागातील दुकाने रात्री आठ पर्यंत उघडी राहणार...

कोरोना रूग्ण संख्या नियंत्रण असणार्‍या भागातील दुकाने रात्री आठ पर्यंत उघडी राहणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
275
जामखेड न्युज – – – – 
कोरोना रुग्णवाढ राज्यात कमी होत नसल्यानं राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंध अद्यापही कडक आहेत. मुंबईत देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं बंधन अद्याप आहेच. मुंबई लोकल केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु आहे. यात सर्वसामान्य लोकांकडून सर्वांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी होत आहे.
       याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये महत्वाचं भाष्य केलं आहे. लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाहीयेत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सांगली येथे पूर परिस्थितीची आढावा बैठक घेऊन नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, ज्या भागात कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आहे त्या भागातील दुकाने रात्री आठ पर्यंत उघडी ठेवता येतील याबाबतचा अद्यादेश आज निघेल असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!