जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड नगरपरिषदेच्या कचरा गोळा करणार्या घंटा गाडीवरील चालक व बरोबरचे कर्मचारी महिला व मुलींशी उद्धट वर्तणूक करतात कचरा टाकण्यासाठी मदत करत नाहीत. याविषयीचे निवेदन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना दिले होते. तक्रारीची दखल घेत मुख्याधिकारी यांनी उद्धट वर्तणूक नसणाऱ्या चालकास काढून टाकण्याची सूचना ठेकेदाराकडे केली आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड शहरात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी फिरते.मात्र त्या गाडी सोबत येणारा कर्मचारी कचरा देण्यासाठी येणाऱ्या महिला,मुली यांचेशी अर्वाच्य,उद्धट भाषेत बोलतात.घंटागाडी मध्ये कचरा टाकण्यासाठी घराच्या बाहेर घरातील महिला,मुलगी किंवा मुलगा येतो.त्यावेळी घंटागाडी वरील कर्मचारी यांचेकडून होणारी वागणूक हि महिलांना न शोभणारी आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्याची योग्य ती दखल घ्यावी.
महाराष्ट्रातील इतर नगर परिषदा, नगर पालिका, महानगरपालिका यामध्ये फिरणाऱ्या घंटागाडी सोबत येणारे कर्मचारी स्वतः कचरा घेऊन घंटागाडीत टाकतात. परंतु आपल्याकडे नागरिकांना घंटागाडी मध्ये स्वतः कचरा टाकावा लागतो व तो ओला आणि सुका असा वेगळा करून सुद्धा इकडे टाका तिकडे टाका असे सांगणारा घंटागाडी सोबतचा कर्मचारी कसलीही मदत करत नाही. उलट येणाऱ्या महिला,मुली,मुले उंचीने लहान असतील तर तो कचरा गाडीत पडण्याऐवजी पुन्हा त्यांच्या हातावर पडतो. अशावेळी घंटागाडी सोबतच्या कर्मचाऱ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक कर्मचाऱ्याच्या उद्धट वागण्याला सामोरे जावे लागते. त्यासाठी कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या महिला,मुली,मुले यांचेकडून स्वत कचरा घेऊन कर्मचाऱ्यानी तो कचरा घंटागाडीत टाकावा व कचरा बकेट जागेवर ठेवावी.
सध्या कोरोनाचा काळ आहे.पावसाळ्यात साथीचे,संसर्गजन्य रोग बळावण्याची शक्यता असते.शहरात स्वच्छता नसेल तर शहरातील आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.त्यासाठी शहरातील स्वच्छता हा विषय फार महत्वाचा असल्याने कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडी वरील कर्मचाऱ्याना स्वच्छतेबाबत व त्यांच्या वागणुकीबाबत आपल्या पातळीवरून योग्य त्या सूचना व्हाव्यात. जेणेकरून जामखेड शहर सुंदर व स्वच्छ होण्यास मदत होईल.
याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की याबाबत संबंधित ड्रायव्हरला काढून टाकण्याची सूचना केली असून दोन ते तीन दिवसांत ठेकेदारमार्फत नवीन ड्रायव्हर नियुक्त होईल. कोणत्याही नागरिकांची तक्रार येणार नाही याची काळजी कर्मचाऱ्यांनी घ्यावी