साकतच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अनेक वर्षापासून वानराची हजेरी पहिल्या दिवशी हभप परमेश्वर महाराज केरूळकर यांची किर्तन सेवा संपन्न

0
494

जामखेड न्युज——

साकतच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अनेक वर्षापासून वानराची हजेरी

पहिल्या दिवशी हभप परमेश्वर महाराज केरूळकर यांची किर्तन सेवा संपन्न

महान संत श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांचे ४२ वर्षापूर्वी देहावसन झाले तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी वानर आले होते. अंत्यसंस्कार होईपर्यंत होते दुसऱ्या दिवशी हस्ती गोळा करण्यासाठी पण ते हजर होते. अशा या महान विभुतीने साकतमध्ये वीनावादन व नंदादीप सुरू केला तसेच अखंड हरिनाम सप्ताह पण असतो तसेच त्याच्या पुण्यतिथी निमित्तही सप्ताह असतो दोन्ही सप्ताह साठी नित्यनेमाने दरवर्षी वानरराज हजेरी लावते सर्व ग्रामस्थ या वानरराजास गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज रूपाने हनुमंत राय पाहतात व भक्ती भावाने दर्शन घेतात.

आज सप्ताहाच्या पहिल्या दिवशी हभप परमेश्वर महाराज केरूळकर श्री क्षेत्र आळंदी देवाची यांची किर्तन सेवा होती किर्तन सेवेसाठी त्यानी

।। सुख वाटे हेचि ठायी । बहु पायी संतांच्या ।।1।।
।। म्हणउनि केला वास । नाही नाश तये ठायी ।।धृ।।
।। न करवे हालीचाली । निवारीली चिंता हे ।।4।।
।। तुका म्हणे निवे तनू । रजकणू लागता ।।3।। हा अभंग निवडला होता

स्पष्टीकरण- संत तुकोबांचे ध्येय पारमार्थिक सुख आहे आणि ते कूठे मिळेल,त्यासाठी काय करावे लागेल व त्या सुखाने नक्की काय होईल याविषयी त्यांना पूर्ण कल्पना आहे.

वरील अभंगातून महाराज सूचवितात की हे पारमार्थिक सुख संताच्या पायांपाशी विपुल प्रमाणात आहे.(आता पायापाशी सुख आहे याचा अर्थ त्यांचे पाय जीवी धरल्याशिवाय म्हणजेच त्यांना शरण गेल्याशिवाय ते मिळणार नाही हे उघड आहे.)

या सुखासाठी तुकोबांनी संतचरणावर भाव लीन केला आहे.संत उत्पत्तिनाशाच्या पलीकडे असल्यांमुळे त्यांच्याकडून प्राप्त होणार्‍या सुखाला सुद्धा नाश नाही,कालबाधा नाही हा त्यांचा निश्चय आहे

श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज (आबा) हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. त्यांनी नैष्ठिक ब्रम्हचारी जीवन जगून अवीरथ भगवंत भक्ती केली. ब्रम्हचारी व्रताची पावती म्हणून अंत्यविधीला वानराच्या रूपाने हजर राहून स्वतः अस्ती बाजूला काढून रक्षा सावडली ते आजही नामसप्ताहमध्ये प्रत्यक्षात आठ दिवस वानर रूपाने हजेरी लावते. आज सुरू होणाऱ्या सप्ताह साठी आज सोमवार दि २४ रोजी हजेरी लावली आहे.


अशा सत्पुरुषाच्या हस्ते साकत येथे १ मे १९५५ साली अखंड वीणा व नंदादीप विठ्ठल मंदिरात सुरू केले ते आजपावेतो सुरू आहे. अशा पुण्यभूमीत अखंड हरिनाम सप्ताह साठी वानराने आजच पहिल्या दिवशी गावात हजेरी लावली आहे सकाळी सप्ताह मंडपात वानराने हजेरी लावली. साकत पंचक्रोशीतील लोक वानराला आबाच्या रूपाने पाहतात. व दर्शन घेतात.

भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण तुकाराम गाथा पारायण
सोहळ्याची मोठ्या उत्साहात आज प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास सोमवार दि २४ रोजी सुरू होत आहे. यात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच तुकाराम महाराज चरित्र, काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा भजन, हरिपाठ, किर्तन व नंतर गावजेवण व हरिजागर असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. सप्ताहाची सांगता सोमवार ३१ रोजी होणार आहे.

जामखेड तालुक्यातील साकत येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. २४ पासून सुरू होत आहे व सोमवार दि. ३१ रोजी सांगता होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्व सज्जन भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे कि, श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. गावात अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह साठी गेल्या वीस वर्षापासून वानर नित्यनेमाने हजेरी लावत आहे. फोटो ग्राफर ओम दळवी साकत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here