प्रा. मधुकर राळेभातच खरे लफंगे – रमेश आजबे आमदार रोहित पवारांनी विकास कामे करून विरोधकांची तोंडे बंद केली

0
1031

खेड न्युज——

प्रा. मधुकर राळेभातच खरे लफंगे – रमेश आजबे

आमदार रोहित पवारांनी विकास कामे करून विरोधकांची तोंडे बंद केली

 

आमदार रोहीत पवार यांच्यानंतर असलेले दुसर्‍या क्रमांकाचे पद प्रा. मधुकर राळेभात यांना देऊन आ. रोहीत पवार यांनी त्यांचा मानसन्मान दिला. आता विधानसभा निवडणुक आली की ते विरोधकांना मिळाले व आ. रोहीत दादा यांनाच लफंगा म्हणतात. तसे पाहिले तर खरे लफंगे प्रा. मधुकर राळेभातच आहेत. आमदार रोहित पवारांनी विकास कामे करून विरोधकांची तोंडे बंद केलेली आहेत.
कर्जत जामखेड मतदारसंघाला रोहित पवार आमदार झाल्याने मतदारसंघाचे भाग्य उजळले आहे. जनता सर्व पवारांबरोबर आहे.

त्यांनी 2009 ते 2024 पर्यंत किती पक्ष बदलले. आ. राम शिंदे यांना त्यांनी यापूर्वी तिनदा फसवले आहे त्यामुळे भाजप कार्यकर्ते म्हणतात शिंदे साहेब यांनी तीन वेळा फसवले आता ह्याला एकदा फसवून टाका. त्यामुळे खरे लफंगे राळेभात आहेत अशी सडकून टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रमेश आजबे यांनी मधुकर राळेभात यांच्यावर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वाभिमानी यात्रा जामखेड तालुक्यातील जवळका येथे गुरुवारी आली होती त्यावेळी अयोजीत सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रमेश आजबे बोलत होते. यावेळी आजबे म्हणाले, आ. रोहीत पवार यांनी मतदारसंघात शब्द दिल्या प्रमाणे विकासकामे करून विरोधकांची तोंड बंद केली आहे.

 

आ. पवार यांनी आणलेल्या कामाला विरोध करून निधी थांबवला आता त्यांना सांगायला काही नाही. दहा वर्षे त्यांनी यात्रा काढली नाही आता लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली गावोगाव संवाद यात्रा काढायची वेळ आली आहे. विकासाच्या मुद्यावर आडवता येत नसल्याने त्यांना बदनाम करण्यासाठी कर्जतमध्ये कुंडलिक जायभाय यांना चेक बाऊंस झाला म्हणून उपोषणाला बसवले. खात्यात रक्कम नसल्यावर चेक बाऊंस होतो पण कारण दुसरेच तसेच कोर्टात केस चालू आहे त्याला पाठिंबा द्यायला चोंडीचा आलीबाबा व आता सोडून गेलेले पाठींबा देत आहे.

आ. रोहीत पवार विकासाच्या मुद्यावर बोलतात अध्यात्म, शिक्षण व आरोग्यात रोहीत दादा राजकारण करत नाही आणि असे रमेश आजबे यांनी ठासून सांगितले.

चौकट

जनतेशी संवाद साधताना वैयक्तिक कामे केलेले नागरीकच सांगतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दि. 5 आँक्टो. पासून चोंडी येथून अहल्यादेवीचे दर्शन घेऊन स्वाभिमानी यात्रा सुरू झाली. शुक्रवार यात्रेचा सातवा दिवस होता. या यात्रेदरम्यान प्रत्येक गावात जाऊन मंदीर मस्जीदची स्वच्छता करणे, प्रत्येक गावात जाऊन वृक्षारोपण करणे व त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत किंवा कार्यकर्ते मार्फत निश्चित केली जात आहे. यानंतर नागरिकांशी संवाद साधला जातो व आ. रोहीत दादा यांनी केलेले विकासकामे सांगितले जातात. परंतु प्रत्येक गावात नागरिक दादांनी आमचे वैयक्तिक आरोग्य, आध्यात्मिक, नौकरी व शैक्षणिक केलेले किस्से सांगतात त्यामुळे आ. रोहीत पवार यांचे काम तळागाळापर्यंत पोहचले हे जाणवते व दादांचा कामाचा प्रभाव पाहण्यास मिळतो. 

विजयसिंह गोलेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here