मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चौंडीत आले आणि गेले, तालुक्यातील अनेक प्रश्न अनुत्तरितच!!!

0
200

जामखेड न्युज——

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चौंडीत आले आणि गेले, तालुक्यातील अनेक प्रश्न अनुत्तरितच!!!

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि फक्त अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवी होळकर नगर एवढीच घोषणा केली बाकी तालुक्यातील प्रश्न अनुत्तरितच राहिले. दोन आमदाराच्या वादात अनेक कामांना सध्या स्थगिती आहे. यामुळे तालुक्यात अनेक प्रश्न तसेच आहेत. या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी कसलीही घोषणा केली नाही. तालुक्यातील जनतेसाठी काहीही मिळाले नाही

पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न

सध्या जामखेड शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. जामखेड शहरात आठ दिवसातून एकदा एक तास पाणी मिळत आहे. भर पावसाळ्यातही अशीच परिस्थिती असते. त्यामुळे तीव्र पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी पुरवठा योजनेची मान्यता दाखवली होती. या निवडणुकीत आमदार प्रा. राम शिंदे पराभूत झाले सरकारही गेले नंतर आमदार रोहित पवार यांनी सुधारित पाणी योजना मंजुरी आणली नंतर परत महाविकास आघाडी सरकार गेले भाजपाचे व शिंदे गटाचे सरकार व विधानपरिषदेत आमदार प्रा राम शिंदे निवड झाली यामुळे श्रेयवादातून एकमेकांच्या कामाला स्थगिती आणण्यासाठी स्पर्धा लागली पाणी योजना रखडली चौंडीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आले असता शहरासह तालुक्यातील जनतेला वाटत होते की, पाणी योजना विषयी काही तरी बोलतील पण दोघांनीही भ्रशब्द काढला नाही. यामुळे लोकांची निराशा झाली.

शहरासह तालुक्यातील रस्त्यांची दैनिय अवस्था

सध्या शहरासह तालुक्यातील रस्त्यांची दैनिय अवस्था निर्माण झाली आहे. अनेक कामे धिम्या गतीने तर काही कामे रखडलेली आहेत. यामुळे धुळ, खड्डे याचा जनतेला खुपच त्रास सहन करावा लागतो. याविषयी काही घोषणा होईल जामखेड शहरातील रस्ता कधी सुरू होणार याविषयी काहीही झाले नाही निराशाच झाली.

रोजगाराचा गंभीर प्रश्न

शहरासह तालुक्यात सुशिक्षित रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तो सोडविण्यासाठी एमआयडीसी बाबत काही तरी घोषणा होईल असे वाटत होते पण कसलीही घोषणा नाही. यामुळे सुशिक्षित तरुणांची भ्रमनिराशा झाली आहे.

अतिवृष्टी व पिकविमा अनुदानापासून तालुक्यातील अनेक शेतकरी वंचित

पंचनामे झाले सर्व सोपस्कार पुर्ण झाले आठ महिने झाले तरीही आणखी तालुक्यातील अनेक शेतकरी पिक विमा व अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. खरीप हंगाम पीक विमा बाबत आँनलाईन तक्रारी केल्या, आँफलाईन फाँर्म भरले उतारे जोडले फोटो जोडले पण विमाच नाही तसेच अतिवृष्टीने बाधीत क्षेत्राचा पंचनामा तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक यांनी केले गुडघाभर चिखलात पंचनामे केले माहिती पाठवली अद्यापही अनुदान नाही. लवकरच अनुदान देऊ म्हणणारे आता आठ महिने झाले तरी अद्याप अनुदान नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी साधा उल्लेख पण केला नाही.

अहिल्यादेवी होळकर यांचा प्रजाहितदक्ष राज्यकारभार

 

अहिल्यादेवी होळकर यांचा कारभार प्रजाहितदक्ष होता न्याय होता मुलभूत प्रश्न, पाणी योजना याचा प्राधान्याने सोडविल्या जात होत्या. अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा आम्ही चालवतोय म्हणणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना मात्र तालुक्यातील पाणीप्रश्न, रोजगाराचा प्रश्न, रस्त्याची दुर्दशा हे प्रश्न दिसले नाहीत तसेच आमदार प्रा राम शिंदे यांना ते प्रश्न महत्त्वाचे वाटले नाहीत. असेच म्हणावे लागेल. यामुळे सध्या तालुक्यात एकच चर्चा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चौंडीत आले आणि गेले, तालुक्यातील अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here