नवज्योत प्रकल्पाच्या पायाभरणीसाठी विजय कोठारी यांच्याकडून 21 हजाराची मदत….

0
585
जामखेड प्रतिनिधी 
         जामखेड न्युज – –  (सुदाम वराट) 
श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवज्योत प्रकल्पाच्या नियोजित ईमारतीच्या प्रतिमेचे अनावरण उद्योजक विजय कोठारी यांच्या शुभहस्ते व तक्षशिला ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष संजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, प्रमुख पाहुणे म्हणून अभिमन्यु पवार, संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ मिसाळ, बापूसाहेब गायकवाड, संभाजी मुळे, लक्ष्मी मिसाळ, सरपंच शिवाजी ससाणे, पंडित गायकवाड, विशाल अब्दुले, सचिन सदाफुले, सुरेखा सदाफुले, उषा राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ व माहितीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित वृद्ध व मुलांना मान्यवरांच्या हस्ते मिठाई व कपडे वाटप करण्यात आले.
        संस्थेचे संस्थापक संतोष गर्जे यांनी श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन नव्याने सुरू केलेल्या नवज्योत प्रकल्पाची संकल्पना सांगितली. कोरोना सारख्या महामारीने अनेकांना जीवन जगणे देखील कठीण झाले असल्याने त्यामध्ये अनेक वयोवृद्ध लोकांना उपासमारीने जीव गमवावा लागणे, भीक मागणे, भटकंती करणे, आत्महत्या करणे असे पर्याय निवडू लागल्याने संस्थेच्या माध्यमातून वयोवृद्ध लोकांसाठी वृद्धाश्रम व कोरोनाग्रस्त पिडीतांची मुले, निराधार, ऊसतोड मजूर, गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवज्योत प्रकल्पाची स्थापना करत असल्याचे सांगितले. प्रकल्पाच्या माध्यमातून वृद्धांना व मुलांना कपडे, आरोग्य तपासणी, जेवण, राहण्याची सोय, मनोरंजनासाठी आवश्यक ती साधन सामग्री, शैक्षणिक साहित्य, धार्मिक स्थळांना भेटी, शैक्षणिक सहली, चर्चासत्रे ई. अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
                       ADVERTISEMENT
      विजय कोठारी यांनी बोलताना सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या वृद्धाश्रमासाठी शुभेच्छा देत नवीन ईमारतीच्या पायाभरणीसाठी 21 हजाराची मदत देत असून पुढील काळात वेळोवेळी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. अभिमन्यु पवार यांनी प्रकल्पास शुभेच्छा दिल्या. सरपंच शिवाजी ससाणे यांनी देखील नायगाव व परिसरातील गावातून प्रकल्पासाठी लागणारी आवश्यक ती मदत करण्याचे जाहीर केले.
   कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय कदम यांनी बोलताना सांगितले की रघुनाथ मिसाळ हे सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे वेगवेगळ्या कार्यक्रमातून दिसून येते त्यामध्येच त्यांनी वृद्ध व मुलांसाठी निवासी प्रकल्प सुरू करून जामखेड तालुक्यातील गरजु गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या प्रकल्पास शुभेच्छा देत या प्रकल्पातील मुले निश्चित स्पर्धा परीक्षांमध्ये आपले नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
    बापुसाहेब गायकवाड यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत तालुक्यातील वयोवृद्ध व गरजु मुलांना प्रकल्पातील सोईसुविधांचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
     यावेळी ,  शिवनाथ शिंदे, मोहन शिंदे, सागर सावंत, साहेबराव शिंदे, गोरख शिंदे, मच्छिंद्र सावंत, राहुल सावंत, भारत सावंत, प्रकाश शिंदे, शिवाजी शिंदे, राजु चौगुले, सुनिल चव्हाण, सागर शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here