समाजकारण, शिक्षण व अर्थकारणातील यशानंतर राजकारणातही हजारेंना पसंती आजिनाथ हजारे यांच्या सौभाग्यवती धनलक्ष्मी हजारे भाजपाकडून जवळा गटासाठी इच्छूक

0
123

जामखेड न्युज——

समाजकारण, शिक्षण व अर्थकारणातील यशानंतर राजकारणातही हजारेंना पसंती

आजिनाथ हजारे यांच्या सौभाग्यवती धनलक्ष्मी हजारे भाजपाकडून जवळा गटासाठी इच्छूक

जवळा जिल्हा परिषद गट ओबीसी महिला साठी राखीव झालेला आहे त्यामुळे समाजकारण, शिक्षण, अर्थकारणातील यशानंतर राजकारणातही हजारे दाम्पत्यास अधिक पसंती मिळत आहे. चेअरमन आजिनाथ हजारे यांनी त्यांच्या सौभाग्यवती धनलक्ष्मी हजारे यांना जवळा जिल्हा परिषद गटातून उभे करावे म्हणून कार्यकर्त्तांचा मोठ्या प्रमाणावर आग्रह धरला आहे.
सभापती प्रा. राम शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आजिनाथ हजारे परिचित आहेत. जवळा जिल्हा परिषद गटातून आपल्या पत्नी धनलक्ष्मी हजारे यांना भाजपाकडून उमेदवारी साठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांनीच उभे राहावे म्हणून जवळा गटातील बहुतेक मतदारांनी इच्छा व्यक्त केली जात आहे.

आजिनाथ हजारे यांच्या विषयी थोडक्यात माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक ते २५०० कर्मचाऱ्यांना नोकरी देणारे ‘ज्योती क्रांतीमल्टीस्टेट’ चे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ हजारे. दोन तपांच्या खडतर परिश्रमातून घडलेले हे नेतृत्व. कल्पकता, मेहनत, संघटन कौशल्य आणि सततच्या प्रयत्नातून आज चार राज्यांमध्ये ज्योती क्रांतीचा विस्तार वाढलाय. सामाजिक समतोल व विकास साधण्यासाठी अजिनाथ हजारे समाजकारणा बरोबरच राजकारणातही सक्रिय झाले आहेत. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेयांच्या नेतृत्वाखाली जवळा जिल्हा परिषद गटातून आपल्या सौभाग्यवती धनलक्ष्मी हजारे यांच्या साठी जनमताचा कौल आजवण्याची त्यांची तयारी केली आहे.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आजिनाथ हजारे यांनी मोठ्या कष्टातून आपले शिक्षण पूर्ण केले. पुढे ते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून हजर झाले. शिक्षक म्हणून सेवा करताना गावातील शिक्षक मित्रांचे संघटन त्यांनी तयार केले. सर्वांच्या गृहलक्ष्मींना एकत्र करून २००० साली हजारे यांनी ज्योती क्रांती पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. आज संस्था मल्टीस्टेट बँक बनली आहे. ४ राज्यात विस्तारलेल्या ज्योती क्रांतीच्या माध्यमातून अजिनाथ हजारे यांनी तब्बल २५०० लोकांना नोकरीची संधी दिली, तर ३५ ते ४०,००० लहानमोठे व्यवसाय करणाऱ्यांना अर्थसहाय्य करून स्वतःच्या पायावर उभे केले. ५०,०००
महिलांना बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अर्थसहाय्य केले.

विधानसभेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरावर पदाधिकारी म्हणून काम करीत आहेत. पक्ष संघटने करिता ठरवून दिलेल्या उपक्रमांमध्ये आजिनाथ हजारे हे नाव आघाडीवर राहिलेले आहे. प्रा.शिंदे यांच्याशी २००७ पासूनते निष्ठेने काम करीत आहेत.आजतागायत अजिनाथ हजारे यांनी पक्षाच्या चिन्हावर तालुकास्तरावरची निवडणूक लढवलेली नाही. यावेळी मात्र जिल्हा परिषदेच्या जवळा गटातून जनमताचा कौल आजमाविण्याची त्यांची तयारी केली आहे.


आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या
सामाजिक जाणिवेतून हजारे यांनी मल्टिस्टेटची शाखा सुरू केलेल्या प्रत्येक गावात दरवर्षी माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या गुणवंतांचा
गुणगौरव सोहळा सुरू केला. निरनिराळ्या स्पर्धात्मक परिक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव दिला.विद्यार्थी घडला पाहिजे, पिढी सुधारली पाहिजे, कुटुंबात रोजगार मिळाला पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कार्य केले.

आता मात्र हेच काम जवळा जिल्हा परिषदगटात अधिक प्रभावीपणे करण्याचा त्यांचा मानस आहे. गटातील प्रत्येक गावाची शाळा आदर्श झाली पाहिजे, शेती विकसित झाली पाहिजे,शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. त्याशिवाय खन्या अथनि आर्थिक
सुबत्ता निर्माण होणार नाही असे अजिनाथ हजारे म्हणतात. सामाजिक उपक्रमात ही आघाडीवर आजिनाथ हजारे हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर असतात.
कोविड काळात त्यांनी बँकेच्या माध्यमातून एस.एम.एस. फोनद्वारे व कर्मचारी घरी पाठवून घरपोहोच कॅश देण्याचे काम केले. तालुक्यात सुरू असलेल्या कोवीड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याची मोठी मदत त्यांनी केली. तसेच कोरोनाच्या काळात आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या गोरगरिबांना किराणा वाटप कोविडमध्ये ज्यांना बेड उपलब्ध होत नाही त्या रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्याचे काम केले. रेमडीसीवरची इंजेक्शन मोफत दिली. दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई व जनावराच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी आजिनाथ हजारे यांनी पुढाकार घेऊन चारा छावणी चालवली. जनावरांना चारा व लोकांसाठी पाण्याचे टँकर दिले. विशेष म्हणजे बँकेच्या प्रत्येक शाखेच्या वर्धापनदिनी रक्तदान शिबिर घेणे सक्तीचे केले. शाखेच्या प्रत्येक ठिकाणी दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचे प्रयोजन केले कबड्डी, वक्तृत्व,निबंध, चित्रकला यांसारख्या विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला तसेच विद्यार्थी घडविण्यासाठी जवळा येथे स्वतः माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुरू केले आहे. याच सामाजिक व शैक्षणिक आर्थिक यशानंतर आता राजकारणात धनलक्ष्मी हजारे यांनी लढवावी अशीच मागणी जवळा गटातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here