अहिल्यादेवींनी हिंदू धर्म जीवंत ठेवण्याचे काम केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौंडी हे पवित्र तीर्थक्षेत्र पोस्टर व बँनर लावून विद्रुपीकरण नको – सभापती प्रा राम शिंदे पालकमंत्र्याच्या भाषणावेळीच मुलाचा काढता पाय जयंती उत्सवास काका पुतण्या गैरहजर
अहिल्यादेवींनी हिंदू धर्म जीवंत ठेवण्याचे काम केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चौंडी हे पवित्र तीर्थक्षेत्र पोस्टर व बँनर लावून विद्रुपीकरण नको – सभापती प्रा राम शिंदे
पालकमंत्र्याच्या भाषणावेळीच मुलाचा काढता पाय
जयंती उत्सवास काका पुतण्या गैरहजर
संपूर्ण देशात मंदिर जीर्णोद्धार करत आदर्श राज्यकारभार करत हिंदू धर्म जीवंत ठेवण्याचे काम केले तसेच आदर्श न्याय व्यवस्था, आदर्श कर व्यवस्था, शेती व्यवस्था निर्माण करत आपल्या संस्थानात हुंडाबंदीचा निर्णय राबविला आजच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता अहिल्यादेवींचा आदर्श घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडी येथे जयंती कार्यक्रमात केले.
चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे,आमदार गोपीचंद पडळकर, मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डीले, सुरेश धस, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, अमोल खताळ, माजी मंत्री आण्णा डांगे, बबनराव पाचपुते, स्नेहलता कोल्हे, रमेश शेंडगे, प्रा.लक्ष्मण हाके, जिल्हाधिकारी डॉ.पकंज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या सह मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्ही पंतप्रधान व राष्ट्रपती यांना जयंती कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. आज अहिल्यादेवींच्या जन्मस्थान चौंडी व कर्मभूमी माहेश्वर सह देशभरात जयंती कार्यक्रमाचे आयोजन आहे. यावेळी पंतप्रधान कर्मभूमी येथे गेले पुढील वर्षी जन्मभूमी चौंडी येथे येतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,या मातीत आपला जन्म झाला हे आपले भाग्य आहे. अहिल्यादेवींनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला, लोककल्याणकारी राज्य कारभार केला. आपल्या कार्याचा ठसा उमटविला, मानवतेचा धर्म पाळला, महिला शिक्षण सुरू केले व अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा अहिल्यादेवींच्या कार्यातून आपण शिकलो. जिल्ह्याचे अहिल्यानगर नावाची घोषणा याच व्यासपीठावर झाली होती त्याची अंमलबजावणी ही लगेच झाली.
यावेळी स्वागताध्यक्ष सभापती प्रा राम शिंदे म्हणाले की, अहिल्यादेवींचे जन्मगाव चौंडी हे आपले सर्वांचे ऊर्जास्त्रोत व प्रेरणास्थान आहे. यामुळे याठिकाणचे पावित्र्य आपण सर्वांनी राखावे व पोस्टर बाजी बँनर बाजी करून विद्रुपीकरण करू नये असे आवाहन केले. एका महिन्यात दोन वेळा मुख्यमंत्री चौंडीत आहेत ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. चौंडी येथील विकास आराखड्यासाठी सरकारने 681 कोटींच्या खर्चास मंजुरी दिली आहे. यातील साडेतीनशे कोटींचे रस्त्यांनी चौंडीला जोडणार आहे.
चौकट पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे भाषण सुरू असतानाच माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील व आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी घेतला काढता पाय, वडिलांचे भाषण सुरू असताना मुलगा डॉ सुजय विखे पाटील बाहेर गेले याबद्दल उपस्थितीमध्ये वेगळीच चर्चा रंगली.
चौकट
पुतण्याच्या मतदारसंघाकडे काकांनी फिरवली पाठ कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव होते पण ते कार्यक्रमास आलेच नाहीत. तसेच विद्यमान आमदार रोहित पवार हेही अनुपस्थित होते. काका पुतण्या दोघेही गैरहजर अशीच चर्चा होती