जामखेड शहरात राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धुळ, थोड्याशा पावसाने चालणे मुश्किल खर्डा चौक ते विश्वक्रांती चौक राष्ट्रीय महामार्गाला मुहूर्त कधी ?

0
238

जामखेड न्युज—–

जामखेड शहरात राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धुळ, थोड्याशा पावसाने चालणे मुश्किल

खर्डा चौक ते विश्वक्रांती चौक राष्ट्रीय महामार्गाला मुहूर्त कधी ?

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मुदत अठरा महिन्यांची असताना अडीच वर्षे झाले तरी जामखेड शहरातील सर्व रस्ता पुर्ण झालेला नाही. खर्डा चौक ते विश्वक्रांती चौक रस्ता अपुर्ण आहे. कुठे खोदलेला रस्ता तर कुठे टाकलेला मुरूम यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. तसेच मणके रिकामे होत आहेत. थोडा पाऊस झाला की सगळीकडे चिखल दलदल होते. वाहने घसरतात तर नंतर धुळीचा मोठा प्रादुर्भाव होतो. शहरवासीयांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता नेमका का होत नाही. कोणाची काय अडचण आहे. अधिकारी पदाधिकारी गप्प का? अशी चर्चा जामखेड शहरात सुरू आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मुदत अठरा महिन्यांची असताना अडीच वर्षे झाले तरी पंचवीस टक्के काम पूर्ण झाले नाही. अर्धवट रस्ता कुठे खोदून ठेवलेला तर कुठे टाकलेला मुरूम, कुठे खडी तसेच सलग काम न करता कामात धरसोड, हवा तेवढा रस्ता उकरलेला नाही. यामुळे नागरिकांना होणारा त्रास, तसेच सिमेंट रस्त्यावर दिशादर्शक फलक नसणे, काम सुरू वाहने सावकाश चालवा फलक नसणे, रेडियम नसणे, यामुळे रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अतिक्रमण काढताना दुजाभाव, गोरगरिबांना उठ, धनदांडग्यांना सूट !

मागे काही महिन्यापूर्वी शहरामध्ये प्रशासनाने कारवाई करताना दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. गोरगरीबांना रस्त्यावरून ऊठ तर धनदांडग्यांना दिलेली सूट पाहता संताप व्यक्त केला आहे. या वेळेस लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एक दिलाने काम करून ‘उद्याच्या भविष्यातील जामखेड’ होण्यासाठी सरसकट अतिक्रमण मुक्त जामखेड करावे अपेक्षा सुजन नागरिक करत आहे.


लवकरात लवकर अतिक्रमण हटवून सुसज्ज रस्ता बनवावा अशी चर्चा सर्व सामान्य नागरिकांमध्ये आहे.

शहरातील रस्ता अनेक ठिकाणी खोदलेला, काही ठिकाणी मुरूम खडी ढिगारे, एकेरी वाहतूक व्यापाऱ्यांच्या दारात खडी व मुरूम ढिगारे, खोदलेला रस्ता यामुळे सगळीकडे धुळ यामुळे शहरातील बीड रोडवरील व्यापारी वर्ग तसेच नागरिक हैराण झाले आहेत. आम्ही दुकाने कशी चालवायची असा प्रश्न केला होता. ठेकेदारांने राॅयल्टी का भरलेली नाही, नेमके महसूल विभागाला शहरात अडचणीच्या ठिकाणी काम असताना राॅयल्टीचे सूचले का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

अडिच वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अठरा महिन्याची मुदत असताना अडीच वर्षे झाले तरी पंचवीस टक्के काम झाले नाही. आगोदर विधानसभा निवडणुकीमुळे लोकप्रतिनिधी गप्प राहिले आता परत नगरपरिषद निवडणूक होणार म्हणून परत लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प आहेत. एरवी विकास कामाच्या बाबतीत श्रेयवाद उफाळून येतो मीच आणले म्हणून प्रेसनोट येतात. यामुळे वेळेत नियमानुसार रस्ता होण्यासाठी, विधानपरिषदेचे सभापती, खासदार, आमदार यांनी
गप्प दिसत आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्याचे अतिक्रमणे निघाली पण जामखेड शहरातील अतिक्रमणे निघत नाहीत नेमकी काय अडचण आहे असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे. जामखेड शहरातील जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाल्याने गोरगरीबांची दुकाने व टपर्‍या पुर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत.

आता खर्डा चौक ते विश्वक्रांती चौक या शहरातील मार्गाला मुहूर्त कधी लागणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. या रस्त्यावर खडी मुरूम अंथरून ठेवलेला आहे. टायरखाली खडी उडून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांना मणके विकार झाले आहेत. तर आता पावसाळ्यात चिखल व दलदल होणार आहे. कालच्या थोड्याच पावसाने रस्त्यावर चालता येत नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here