जामखेड न्युज——
गाव चलो अभियानात नाहुलीमध्ये प्रा. दादासाहेब मोहिते यांची चाय पे चर्चा
ग्रामस्थांना दिली शासनाच्या योजनेबाबत माहिती
भाजपाचे गाव चलो अभियान अंतर्गत प्रा.दादासाहेब मोहिते यांच्याकडे नाहुली गावाची जबाबदारी दिली होती. भाजपा सरकारच्या विविध योजना विषयी ग्रामस्थांशी चाय पे चर्चा केली व माहिती सांगितली.
गाव चलो अभियानांतर्गत त्यांनी तेथील युवक वयोवृद्ध मध्यमवयीन लोकांशी सव्वांद साधुन केंद्र व राज्य सरकार च्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या प्रकारे तसेच मोदी की गांरटी,सशक्त शेतकरी याबाबत माहिती सांगितली.
समृद्ध भारत आयुष्यमान भारत, महिला शक्ती नवी गती , (सुकन्या समृद्धी योजना) मेट्रो रेल्वे ची सुरूवात पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास, पाच लाखापर्यंत मोफत विमा, समृद्धी महामार्ग समुद्रावरील सर्वात लांब पूल ( अटल सेतु)
कृषी कल्याण योजना, गडकिल्यांचे व तिर्थक्षेत्रांचे संवर्धन पी एम आवास योजना, अयोध्या मध्ये राम मंदिर बांधकाम पूर्ण झाले, कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये घट अशा विविध योजना बद्दल माहिती दिली.
त्यावेळी गावातील नाहुली बुथ प्रमुख-नामदेव गर्जे, धनंजय बहिर चेअरमन, युवा नेते शांतीलाल सपकाळ, माजी सरपंच बाबासाहेब गोरे, राजेंद्र यशवंत गर्जे, आबासाहेब शरद बहिर, रघुनाथ जगनाथ जाधव, शिवाजी काशिनाथ गर्जे, देविदास भिवा गर्जे, ज्ञानदेव पाटील, अण्णा बहिर, शंकर बबन गर्जे, बाळासाहेब जगन्नाथ गर्जे, तानाजी गर्जे, शिवाजी मधुकर गर्जे, कल्याण जाधव, माऊली बहिर, सुरेश गर्जे, राजेंद्र अंबादास गर्जे, बारकू जाधव, राहुल रामकिसन गर्जे, सुखदेव गर्जे, नामदेव तात्या, सुरज काशिनाथ ढाकणे, उल्हास बहिर, विकास दामोदर बहिर, वसंत खवळे, माणिक गर्जे, रामकिसन गर्जे, हनुमान तात्या, पांडुरंग जाधव बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.