उद्याचा जामखेडचा आठवडे बाजार बंद – लग्न व धार्मिक कार्यक्रमासाठी परवानगी आवश्यक

0
278
जामखेड प्रतिनिधी 
जामखेड न्युज – – (सुदाम वराट ) 
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. याच अनुषंगाने जामखेड चा उद्या शनिवार दि २७ रोजी भरणारा आठवडी बाजार देखील बंद ठेवण्यात येणार आसल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असुन दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत चालली आहे. याच अनुषंगाने गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ राजेन्द्र भोसले यांनी नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या मध्ये २९ मार्च २०२१ ते १५ एप्रिल २०२१ पर्यंत जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिले आहेत. तसेच साखरपुडा, लग्न आणि धार्मिक कार्यक्रमांनाही संबंधित अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जामखेड तालुक्यातील देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उद्या शनिवार दि २७ रोजी भरणार आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय जामखेड च्या प्रशासनाने घेतला आहे. तसेच त्या पुढील आठवडेबाजार देखील दिनांक १५ एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लग्न समारंभ आणि साखरपुडा यासारख्या धार्मिक समारंभाचे आयोजनास संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍यांची पूर्वपरवानगी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अशा प्रकारच्या कार्यक्रम, समारंभानंतर कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. याशिवाय, जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार दिनांक २९ मार्चपासून ते १५ एप्रिल, २०२१ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतूदीनुसार भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात विवाह समारंभास जास्तीत जास्त ५० व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी आहे. मात्र, लग्न समारंभ असलेले मंगल कार्यालये, लॉन्स, मॅरेज हॉल, आणि इतर समारंभाचे ठिकाणी ५० व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तीउपस्थित राहणे, सोशल डिस्टंन्सिंग, गर्दीचे व्यवस्थापन, समारंभ ठिकाणचे निर्जतुकीकरण, उपस्थित व्यक्तींसाठी सॅनिटायझरची व्यवस्था, ऑक्सीमीटरची व्यवस्था या व अन्य कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणार्‍या मंगल कार्यालयांना १० हजार रुपये दंड करण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी आता लग्न समारंभ, साखरपुडा या सारख्या धार्मिक समारंभ आयोजनास आता संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here