जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
ऐतिहासिक खर्डा येथिल शिवपट्टण किल्ल्यावर सर्वात उंच भगवा ध्वज आमदार रोहित पवारांनी उभारला त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होऊन इतिहासाला उजाळा मिळाला आहे. स्वराज्य भगवा ध्वज व खर्डा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी वाढू लागली आहे. महामार्गावरून जाणारे पर्यटक व मुद्दामच किल्ला व भगवा स्वराज्य ध्वज पाहण्यासाठी दररोजच मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे त्यामुळे हे पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे.
याबाबत माहिती अशी की खर्डा येथील ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिसरात भारतातील सर्वात उंच स्वराज्य भगवा ध्वज आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून दसऱ्याचे दिवशी हजारो जणसमुदाय यांच्या उपस्थितीत फडकला गेला.
ADVERTISEMENT

खर्डा येथिल शिवपट्टण किल्ल्याच्या समोरूनच शिर्डी हैदराबाद हा राज्य मार्ग आहे, वाहनांची मोठी वर्दळ येथूनच बार्शी, येरमाळा, तुळजापूर, सोलापूर, गाणगापूर, हैदराबाद, तसेच शनिशिंगणापूर,शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर,पुणे व मुंबई इत्यादी देवस्थानला जवळून जाणारा हात राज्य रस्ता पूर्वीपासूनच आहे त्यामुळे येथून जाणारे दुचाकी व चारचाकी गाड्यांची चाके या बहुचर्चित स्वराज्य ध्वज व किल्ला पाहण्यासाठी वळू लागली आहेत, याठिकाणी पर्यटक मोबाईल वरून फोटोसेशन व सेल्फी फोटो काढून आनंद घेत आहे दररोज किल्ला पाहण्यासाठी 200 ते 300 गाड्या या ठिकाणी थांबत असल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे हा सर्वात उंच भगवा ध्वज पाहताना एक वेगळाच वातावरण मनामध्ये निर्माण होत आहे हे या ठिकाणी आल्यानंतर जाणवत आहे, सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून या स्वराज्य झेंड्याकडे पर्यटक पाहत आहेत नंतर फोटो काढूनच पर्यटक पूढील प्रवास करताना दिसत आहेत हा भगवा झेंडा फडकवून तीन दिवस झाले नाही तोवरच पर्यटकांची आतापासूनच गर्दी होत असल्याने आगामी काळात स्वराज्य ध्वज व मराठ्यांचा शेवटचा विजय म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या खर्डा शिवपट्टण किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होऊन खर्डा हे आर्थिक उलाढालीचे मोठे केंद्र होण्याची शक्यता आगामी काळात झाल्याशिवाय राहणार नाही अशी आशा येथील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ रोजी झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६X६४ फूट आहे. ध्वज स्तंभाचे वजन १८ टन असून नुसत्या ध्वजाचे वजन ९० किलो आहे. साडे पंचावन्न हजार चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरला आहे. असा हा मंगल ध्वज कर्जत-जामखेडवासियांसाठी सध्या अभिमानाचा विषय आहे. या किल्ल्याची निर्मिती सरदार राजे निंबाळकर यांनी १७४३ साली केली होती. इ.स १७९५ मध्ये अहमदनगर जवळ खर्डा या ठिकाणी हैदराबादच्या निजामाला मराठ्यांनी पाणी पाजले. हि अखेरची शौर्यगाथा याच शिवपट्टण किल्ल्याच्या परिसरात लिहिली गेली. हा ऐतिहासिक किल्ला जामखेड जवळ खर्डा या ठिकाणी आजही भरभक्कम अवस्थेत उभा आहे. अभेद्य तटबंदी असणारा हा किल्ला सहा खणखणीत बुरुजांनी संरक्षित आहे. आता येत्या दस-याला अवघ्या राज्याचं नवं स्वप्न असणा-या या भगव्या स्वराज्य ध्वजाची सन्मानाने दिमाखदार प्रतिष्ठापना झाली आहे आणि पुन्हा एकदा या किल्ल्यासमोर नवा विक्रमी इतिहास रचला गेला आहे.
जसा सर्वात उंच भगवा ध्वज उभारत आमदार रोहित पवारांनी एक इतिहास निर्माण केला आहे. समतेचा एकतेचा स्वराज ध्वज उभारणी झाल्यावर आमदार रोहित पवारांनी स्वतः परिसराची स्वच्छता करत एक आदर्श निर्माण केला आहे.






