शेवगाव च्या मुख्याधिकाऱ्यांना जे जमले ते जामखेड च्या मुख्याधिकाऱ्याला कधी जमणार?
शेवगाव आणि जामखेड नगरपरिषदेची स्थापना एकाच कालावधीत झाली. मात्र विकासकामे आणि अतिक्रमण हटाव कारवाईच्या बाबतीत दोन्ही शहरांचे चित्र पूर्णपणे वेगळे दिसत आहे. शेवगाव चे अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे केले आहेत पण जामखेडमध्ये मात्र अतिक्रमणे निघत नाहीत. अतिक्रमण धारकांना कोणाचे अभय आहे. जामखेडचे रस्ते कधी मोकळा श्वास घेणार असाच प्रश्न जामखेड करांना पडला आहे.
शेवगाव मध्ये महिला मुख्याधिकारी आहेत त्यांनी आठ दिवस आगोदर अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन स्वतः रस्त्यावर उतरून सर्व अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे केले जे महिला अधिकारी करू शकतात ते जामखेड च्या मुख्याधिकारी यांना कधी जमणार जामखेड चे रस्ते कधी मोकळे होणार, कधी मोकळा श्वास घेणार? वाहतूक कोंडी पासुन जामखेड करांची कधी सुटका होणार? असे प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत.
शेवगाव शहरात नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीमेत क्रांती चौक, शिवाजी चौक, जामा मशीद परिसर, बोधेगाव रोड इत्यादी प्रमुख रस्त्यांवरून १५ मीटरच्या मर्यादेतील शेकडो टपऱ्या व पक्के अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.
नगर रोड, पाथर्डी रोड, आखेगाव रोड, गेवराई रोड आणि नेवासा रोड या मुख्य रस्त्यांवरील १५ मीटर अंतरापर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले होते.प्रमुख ठिकाणे: क्रांती चौक, शिवाजी चौक, मोची गल्ली व वरुड रोड परिसरातील अनधिकृत बांधकामे व टपऱ्यांवर हातोडा चालवण्यात आला आहे.
शेवगावमध्ये शहरातून जाणारा राष्ट्रीय नव्हे राज्य मार्ग ३० मीटर रुंदीचा करण्यात आला आहे.गेली ५-६ दिवसांपासून अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. नगरपरिषदेने ७००-८०० अतिक्रमणांवर कारवाई करत जवळपास ३०० दोन ते चार मजली पक्क्या अनधिकृत बांधकामांवरही बुलडोझर चालवला. त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो की, शेवगाव नगरपरिषद एवढी धाडसी आणि आक्रमक भूमिका घेऊ शकते, तर जामखेड नगरपरिषद का नाही?
जामखेडमध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम वर्षानुवर्षे रखडले, अतिक्रमणांचा प्रश्न कायम आहे, वाहतूक कोंडी वाढत आहे आणि नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत प्रशासन कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे?
जामखेड नगर परिषदेवर नेमका दबाव कोणाचा आहे? नगरपरिषद कोणाची पाठराखण करत आहे? सामान्य नागरिकांपेक्षा अतिक्रमणधारकांचे हित अधिक महत्त्वाचे मानले जात आहे का?
नियम सर्वांसाठी समान असतील तर शेवगावमध्ये होणारी कारवाई जामखेडमध्ये का होत नाही, याचे उत्तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर देणे आवश्यक आहे. नागरिकांना विकास हवा आहे, कारणे आणि सबबी नकोत अवधूत पवार – सामाजिक कार्यकर्ते