जामखेड प्रतिनिधी
देशात संगणक क्रांती राजीव गांधी यांच्यामुळे झालेली आहे त्यामुळेच आज जगभरात भारतातील तरुणांना संधी मिळाली आहे. यामुळे देशाचे उत्पन्नात वाढ होऊन देश श्रीमंत झाला आहे. तसेच देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारा हा कॉग्रेस पक्ष असून तो एक विचार आहे. या पक्षात जातीयता नसून सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा मानवतावादी पक्ष आहे त्यामुळे तरूणांनो या विचारप्रवाहात सामील व्हा राजकारणात या व नेतृत्व करा असे आवाहन पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
जामखेड शहारामध्ये काँग्रेस बळकटीकरण सप्ताहनिमीत्त युवक काँग्रेसने चलो वार्ड अभिनयाचा शुभारंभ आ.डॉ.सुधिरजी तांबे यांच्या हस्ते करून युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा सरचिटणीस माणिकराव मोरे, युवक काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष राहुल उगले, शहर काँग्रेसचे अध्यक्ष देवीदास भादलकर, जिल्हा सचिव सुनील शिंदे, अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष फिरोज पठाण, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवराजे घुमरे, नवनिर्वाचित कॉंग्रेस जिल्हा सचिव जमीर सय्यद, तालुका उपाध्यक्ष कुंडल राळेभात, विद्यार्थी काँग्रेस तालुकाअध्यक्ष बळिराम पवार, अनिकेत जाधव, अनिल अडाले, उमेश माळवदकर आदी उपस्थित होते.

यावेळी ज्ञानदेव वफारे व कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले यांनी मार्गदर्शन केले यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी शहर युवक काँग्रेस व प्रभाग निहाय कार्यकारीणी जाहीर करून त्यांना पत्रे देण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल गिरमे यांनी केले तर आभार आदीत्य उगले यांनी मानले.