एसटी संप मिटला का? लांब पल्याच्या बसेस धावल्या; महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ

0
261
जामखेड न्युज – – – – 
सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या बस आता लांब पल्याच्या मार्गावर सुद्धा सुरू होत आहे. विशेष म्हणजे एसटी चाकं फिरत असल्याने महामंडळाच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होताना पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद : गेल्या ५७ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा तिढा अजूनही सुटला नाही. मात्र, असे असतानाही हळूहळू एसटीची चाकं फिरू लागली असून आता लांब पल्याच्या बसही धावू लागल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून सोमवारी ३६ फेऱ्या लांब पल्याच्या झाल्या आहेत.
राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून संपावर गेले आहेत. मात्र, त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेल्याने आणि तारीख पे तारीख सुरू झाल्याने अनेक कर्मचारी आता कामावर हजर होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या बस आता लांब पल्याच्या मार्गावर सुद्धा सुरू होत आहे. औरंगाबाद विभागात औरंगाबाद-नाशिक ०६, उस्मानाबाद ०४, आंबेजोगाई ०४, पुणे शिवशाही २२ अशा लांब पल्याच्या फेऱ्या होत आहे.
विशेष म्हणजे एसटी चाकं फिरत असल्याने महामंडळाच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होताना पाहायला मिळत आहे. २६ डिसेंबर आधी औरंगाबाद विभागाच उत्पन्न ३ ते ४ लाखापर्यंत होते. मात्र लाल परीचे चाक फिरत असल्याने हे उत्पन्न वाढून आता १० ते १२ लाखापर्यंत गेलं आहे. त्यामुळे महामंडळाला एक प्रकारे दिलासा मिळत असल्याचं बोललं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here