मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे संपुर्ण अर्थकारण बदलण्यासाठी कांदा पीक परिसंवाद

0
364
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
 मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे संपुर्ण अर्थकारण बदलण्यासाठी आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून दि. २३ व २४ ऑगस्ट दरम्यान दोन दिवसीय कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा अहमदनगर व कांदा-लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार संघातील कर्जत व जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे संपुर्ण अर्थकारण बदलण्यासाठी “कांदा बी ते बाजारपेठ या विषयावर या परिसंवादात चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
कांदा पीक परिसंवादाचे दि. २३ ऑगस्ट कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील कोपर्डी सभागृहात सकाळी ९ ते १२  व २ ते ५ वाजे दरम्यान म्हाळंगी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच सायंकाळी ६ ते ८:३० दरम्यान राधेश्याम मंगल कार्यालय अंबी जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी दि. २४ ऑगस्ट रोजी जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील सभागृहात सकाळी ९ ते १२ वाजे दरम्यान तर दुपारी २ ते ५ दरम्यान जवळके येथील सभामंडप येथे परिसंवाद पार पडला.
कर्जत व जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आयोजकांच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठय़ा संख्येने उपस्थित राहून परिसंवादाचा लाभ घेतला.
================================
*”कांदा पीक नियोजनासंदर्भात आयोजित कार्यशाळांमध्ये कांदा पिकाचं नियोजन, अर्थकारण, बाजारभाव, बियाणे उत्पादन, कांदा चाळ उभारणी, साठवणूक, कीड व रोग नियंत्रण, वाणातील बदल तसंच निर्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. या परिसंवादाचा मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल, असा विश्वास आहे.”*
*- रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here