Monday, April 6, 2026
Home ताज्या बातम्या गॅस सिलेंडर काळाबाजार व सामान्य जनतेची लुटमार बंद करा, अन्यथा आमदार खासदारांच्या...

गॅस सिलेंडर काळाबाजार व सामान्य जनतेची लुटमार बंद करा, अन्यथा आमदार खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करणार – ॲड डॉ अरुण आबा जाधव

0
2

जामखेड न्युज—–

गॅस सिलेंडर काळाबाजार व सामान्य जनतेची लुटमार बंद करा, अन्यथा आमदार खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करणार – ॲड डॉ अरुण आबा जाधव

वंचित बहुजन आघाडी, जामखेड तालुका यांच्या वतीने आज दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी “नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?” गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई काळाबाजार सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लुटमार या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड डॉ अरुण आबा जाधव व संगीता ताई भालेराव नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर चुल पेटवून आंदोलन करण्यात आले.

यावेळी अरुण आबा जाधव म्हणाले की सध्या देशभरात गॅस सिलिंडरची भीषण व कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आलेली आहे. ही टंचाई नैसर्गिक नसून नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आली असल्याचा ठोस संशय जनतेमध्ये निर्माण झाला आहे. याचाच फायदा घेत काळाबाजार करणारे दलाल व काही संबंधित यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांची उघडपणे आर्थिक लूट करत आहेत.

९१६ रुपयांना उपलब्ध असणारा गॅस सिलिंडर जाणीवपूर्वक बाजारातून गायब करण्यात आला असून, तोच सिलिंडर ४,००० ते ५,००० रुपयांपर्यंत काळ्या बाजारात विकला जात आहे. ही परिस्थिती अत्यंत संतापजनक असून, यामागे कोणाचे संरक्षण आहे, असा थेट प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. महिला, गृहिणी, गरीब, श्रमिक व मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस मिळत नसल्याने त्यांच्या घरातील चुली अक्षरशः विझल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना तासन्तास लांबच लांब रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नाही. ही परिस्थिती अत्यंत अमानुष व असह्य बनली आहे.

एकीकडे सर्वसामान्य जनता मूलभूत गरजांसाठी झगडत असताना, दुसरीकडे काळाबाजार करणारे लोक हजारो रुपये कमवत आहेत. ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे व संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी हे तीव्र आंदोलन उभारण्यात आले आहे.

असे म्हणाले तातडीच्या मागण्या मांडल्या
1. गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई तात्काळ दूर करून पुरवठा सुरळीत करण्यात यावा.
2. काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
3. जादा दराने गॅस विक्री करणाऱ्या एजन्सींवर छापे टाकून त्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात यावेत.
4. गॅस वितरण व्यवस्थेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
5. सर्वसामान्य नागरिकांना योग्य दरात व नियमित गॅस पुरवठा हमीने उपलब्ध करून देण्यात यावा.


जर वरील मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करण्यात आली नाही, तर जनतेचा तीव्र रोष उफाळून येईल आणि हे आंदोलन आणखी व्यापक व तीव्र करण्यात येईल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व सरकारची राहील, याची नोंद घ्यावी असा ईशारा अरुण जाधव यांनी देऊन जामखेड तहसीलदार धनंजय बांगर साहेब यांना निवेदन दिले.

बापू ओहोळ अनिल सदाफुले सलीम मदारी रजनी औटी मनीषा जाधव यांनी भूमिका मांडल्या
यावेळी सुमित भालेराव अंकल घायतडक मच्छिंद्र जाधव संदीप आखाडे विशाल गव्हाळे हरी जाधव नितीन जाधव सचिन चव्हाण ललिता पवार सुरेखा सदाफुले भीमराव चव्हाण ऋषी गायकवाड मनीषा जाधव पूजा जाधव रोहिणी काळे राजू जाधव साहिल जाधव आलेश काळे संतोष चव्हाण उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!