जामखेड न्युज—–
जिजाऊ स्मृतीज्योत रथयात्रेतून शौर्याचा व एकतेचा संदेश – प्रा. मधुकर राळेभात
सिंदखेडराजा ते पाचाड जिजाऊ स्मृतीज्योत रथयात्रेचे जामखेड शहरात भव्य स्वागत
राजमाता जिजाऊंनी स्वकष्टाने सर्वाना एकत्रित करून स्वराज्य निर्माण केले, देशाला एक चांगला आकार दिला या स्मृतीज्योत रथयात्रेद्वारे लोक जिजाऊंच्या शौर्याचा व एकतेचा संदेश घेतील असे मत प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले.
आज सकाळी अकरा वाजता जिजाऊ स्मृतीज्योत रथयात्रेचे जामखेड शहरात भव्य स्वागत करण्यात आले ढोली बाजा व फटाक्यांच्या आतषबाजीने तसेच जय जिजाऊ जय शिवराय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी प्रा. मधुकर राळेभात, भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, अवधूत पवार, पवन राळेभात, मनोज कुलकर्णी, वैजनाथ पाटील, खर्ड्याच्या सरपंच संजिवनी पाटील, अरणगावच्या सरपंच व भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष संगिता पारे, अँड संजय पारे, गोरख घनवट, संभाजी ढोले, सुनील जगताप, दिगंबर चव्हाण, तात्या बांदल, मनोज भोरे, गणेश काळे, राजेंद्र गोरे, अमित जाधव, नवनाथ बहिर, चेअरमन उद्धव हुलगंडे, एकनाथ चव्हाण, अमोल बहिर, जयसिंग उगले, जाकीर शेख, प्रशांत जाधव, ईश्वर मुरूमकर, अँड. हर्षल डोके, शहाजी वायकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या ३५१ व्या पुण्यतिथीनिमित्त जिजाऊंचे जन्मस्थळ मातृतीर्थ सिंदखेडराजा ते समाधीस्थळ पाचाड (किल्ले रायगड) येथे यदुकुलभूषण राजे लखुजीराव जाधवराव तसेच परिसरातील लखुजीराजेंच्या वंशजांच्या वतीने जिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज जामखेड शहरात भव्य स्वागत करण्यात आले.