सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करणार – संचालक दशरथ हजारे
सात ते आठ वर्षापासून बंद असलेला व सध्या आर्थिक अडचणीत असलेला आजीनाथ सहकारी साखर कारखाना शेतकरी हितासाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच आजीनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात येईल अशी माहिती नवनिर्वाचित संचालक दशरथ हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नुकत्याच झालेल्या आजीनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूकीत आमदार नारायण पाटील, जगताप गट व मोहिते पाटील गट यांच्या नवसंजीवनी पॅनल बहुमताने निवडून आला यामध्ये सभापती प्रा. राम शिंदे यांचे सहकार्य लाभले. आता सभापती प्रा शिंदे यांच्या माध्यमातून लवकरात लवकर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असे सांगितले. अजिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मला सर्व मतदारांनी भरघोस मतांनी विजयी केले आहे. त्यामुळे मी सर्वसामान्य उस उत्पादक शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील. माझ्या सारख्या सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील माणसाला उमेदवारी देऊन सेवा करण्याची संधी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही हजारे यांनी दिली.
2017 सालापासून कारखाना बंद आहे. शेजारी खाजगी कारखाने आहेत. त्यांना वाटते कारखाना बंद असावा कारखाना बंद असणे शेतकऱ्यांच्या तोट्याचे आहे. यामुळे आम्ही सभापती प्रा शिंदे यांच्या माध्यमातून तसेच आमदार नारायण पाटील व मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुरू करून दिलासा देऊ असेही हजारे यांनी सांगितले.
सध्या कारखान्यावर 267 कोटी रुपयांचे कर्ज आहे. आता शेतकरी हितासाठी आम्ही सर्व संचालक सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून कारखाना सुरू करू व परिसरातील शेतकऱ्यांना तसेच जामखेड तालुक्यातील 12 गावातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करू असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते विष्णू हजारे गुरूजी यांचा 75 वर्षांत पदार्पण केल्याबद्दल तसेच दशरथ हजारे यांची आजीनाथ सहकारी साखर कारखाना संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
मी सर्वसामान्य शेतकर्यांचा मुलगा असल्याने जामखेड तालुक्यातील बारा गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेणार आहे. असे मत नवनिर्वाचित संचालक दशरथ हजारेसंचालक आदिनाथ सहकारी साखर कारखानायांनी सांगितले.