छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत कोल्हेवाडीच्या तरूणांचा स्तुत्य उपक्रम
रक्तदान म्हणजे जीवनदान! छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून जामखेड तालुक्यातील कोल्हेवाडीच्या तरूणांनी स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन कोल्हे वाडीच्या तरूणांनी रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम राबवला.
यावेळी ३२ रक्तदात्यांनी रक्तदान करत एक आदर्श उपक्रम राबविला आहे.
यावेळी ब्रह्म कोल्हे, डॉ. मंगेश कोल्हे, नेते सागर कोल्हे, आस्तिक कोल्हे, लक्ष्मण कोल्हे, सुभाष रामभाऊ कोल्हे, दादासाहेब कोल्हे, सुभाष सोपान कोल्हे, आदेश सरोदे, किरण कोल्हे, संतोष कोल्हे, गोवर्धन कोल्हे, श्रीकृष्ण कोल्हे, अशोक कोल्हे, शिवम कोल्हे, प्रशांत कोल्हे, राम कोल्हे,शिवाजी कोल्हे, विजय कोल्हे, सुरज कोल्हे, शिवम कोल्हे, विनोद कोल्हे, ज्ञानेश्वर कोल्हे आणि गौरी कोल्हे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून कोल्हेवाडी येथील युवक हा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत.