जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात एक जखमी अरूंद रस्त्यामुळे नेहमीच होतात अपघात

0
1932

जामखेड न्युज——

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात एक जखमी

अरूंद रस्त्यामुळे नेहमीच होतात अपघात

गेल्या वर्षापासून सुरू असलेले जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. काही ठिकाणी सिमेंट रस्ता एक पट्टी तयार तयार झाली आहे पण अरूंद पट्टी मध्ये दोन वाहने बसत नाहीत. काल सायंकाळी भुतवडा येथील विजय भास्कर नागरगोजे हे आपल्या चार चाकी बेलेरो MH 16. DG 4152 गाडीने जामखेड वरून आपल्या घरी पांडववस्ती चालले होते. अमर पॅलेस समोर अचानक समोर मोटारसायकल आल्याने तिला चुकविण्याच्या नादात गाडी रोडखाली जाऊन पलटी झाली. यामध्ये नागरगोजे जखमी झाले डोक्याला गंभीर जखम झाली व बरगडीही पँक्चर झाली. ताबडतोब आसपासच्या मित्रमंडळीनी मदत केली व दवाखान्यात दाखल केले.

जखमीला दवाखान्यात दाखल करताना हरीभाऊ मुरूमकर, रामहरी सानप, अमोल डोंगरे, देविदास सजगणे, बाबू गर्जे, बंटी मेंगडे, ओंकार डोके यांनी मदत केली.


जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने होत आहे. काही ठिकाणी सिमेंट रस्त्याची एक पट्टी तयार झाली आहे पण यावर दोन गाड्या बसत नाहीत. यामुळे या रस्त्यावर रात्रीच्या वेळी सतत अपघात होत आहेत. साकत फाटा ते नायरा पेट्रोल पंप या चारशे मीटर अंतरावर चार महिन्यात अनेकवेळा अपघात झाले आहेत यात दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. लवकरात लवकर रस्ता काम व्हावे अशी मागणी होत आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे. डीएलसी क्राँक्रेटला अनेक ठिकाणी तडे गेले होते. त्यावरच पक्का थर टाकला कामाची जेवढी जाडी हवी तेवढी जाडी नव्हती. तसेच गटार कामे सरळ रेषेत नाहीत. वाकड्या तिकड्या गटारी कामे तसेच अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. काही ठिकाणी गटार कामे एकसलग नाहीत. पाणी नीट मारले जात नाही त्यामुळे अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.

तसेच अनेक ठिकाणी गटारावरील स्लॅब कमी जाडीचा आहे. याबाबत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जामखेड सौताडा महामार्गाबाबत आढावा बैठक घेतली होती यात अनेक नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचला होता. संतगती काम निकृष्ट दर्जाचे काम याबाबत खासदार यांनी ठेकेदारांना चांगल्या दर्जाचे काम करावे, निकृष्ट काम परत करावे कामाची गती वाढवावी याबाबत सूचना केल्या होत्या तरीही कामाची संतगती सुरूच आहे. तसेच गटार कामाला जेथे तडे गेले आहेत ते तसेच आहेत कसलीही दुरूस्ती केलेली नाही.

महामार्गाच्या निकृष्ट कामाचा नमुना समोर आला आहे. तसेच मातीमिश्रीत मुरूम त्यावर मारलेले पाणी यामुळे अनेक लोक गाडीवरून घसरून पडतात यात अनेकांना अपंगत्व आले आहे. तर चार महिन्यात दोन मृत्यू झाले आहेत. ताबडतोब रस्ता कामाची गती वाढवावी तसेच चांगले काम करावे अशी मागणी होत आहे.


जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळीमुळे जामखेड परिसरातील वाहनधारक व नागरिक एक वर्षापासून हैराण आहेत. काही ठिकाणी गटारे केले आहेत. तेही कमी जाडीचे आहेत तर अनेक ठिकाणी गटाराच्या कामाला चिरा पडल्या आहेत. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत आहे.

 

 

जामखेड शहराला जोडणारे रस्ते नगर रोड व बीड रस्त्याची अत्यंत दुरावस्था आहे. यामुळे दररोज अनेक अपघात होत आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळ, रस्त्यावरील खड्डे यामुळे चिंचपूर ते जामखेड व जामखेड ते सौताडा रस्त्याची खुपच दुर्दशा झाली आहे. यामुळे अनेक लोक जामखेड सोडून नगर पुण्याला स्थलांतरित होऊ लागले आहेत. ठेकेदाराने ताबडतोब रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे. ठेकेदारांने कामाची गती वाढवली पण दर्जा बाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. कच्चा सिमेंटचा रस्ता केला आहे त्याला अनेक ठिकाणी तडे गेले होते यावरच पक्का थर टाकला आहे. गटाराचे काम तर खुपच अस्ताव्यस्त केले आहे. यालाही चीरा पडल्या आहेत.

कामासाठी काही ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला आहे यावर मातीमिश्रीत मुरूम यामुळे पावसाळ्यात चिखल दलदल, तर पाऊस उघडला कि, धुळच धुळ तसेच खड्डे यामुळे जामखेड परिसरातील नागरिक वाहनधारक हैराण झाले आहेत. अनेक जण तर जामखेड म्हटले तरी नको रे बाबा असे म्हणतात. एक वर्ष झाले तरी राष्ट्रीय महामार्ग कामाची गती नाही. शहरात अद्याप तशीच परिस्थिती आहे. सध्या धुळीने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सलग काम सुरू नाही कामाचे अनेक तुकडे केले आहेत. जे काम झाले तेही दर्जेदार नाही. अनेक ठिकाणी तडे गेल्याने दर्जा बाबत शंका उपस्थित केली जात आहे.

अनेक लोक जामखेड वगळून दुसऱ्या मार्गाची निवड करत आहेत तर अनेक प्रतिष्ठित नागरीक जामखेड शहर सोडून नगर पुण्याला स्थायीक होऊ लागले आहेत. त्यामुळे ताबडतोब रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा व नागरिकांचे स्थलांतर थांबवावे अशी मागणी केली आहे. रस्त्याच्या कामाची गती वाढवावी तसेच दर्जेदार काम करावे असे नागरिकांना वाटत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यातून जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी. रस्ता १५७.६२ कोटी रुपयांचा रस्ता ठेकेदार ईपीसी कंत्राटदार, धनेश्वर कन्स्ट्रक्शन, गणेश कन्स्ट्रक्शन या तीन ठेकेदारांनी ८६.०९ कोटी रुपयांना काम घेतले आहे. या कामाचे भूमीपूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा राम शिंदे यांनी दि. २४ फेब्रुवारी २४ रोजी केले आहे. अठरा महिन्यात काम करण्याचा कालावधी आहे आठ महिने झाले तरी फक्त रस्ता खोदून माती मिश्रीत मुरूम टाकल्याने सध्या अनेक गाड्या घसरत आहेत. मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. शहरातील अतिक्रमणे तशीच आहेत. लहान लहान टपरी धारकांनी आपापले अतिक्रमण काढले पण शहरातील मोठ मोठे अतिक्रमण तसेच आहेत कामाची गती खुपच संत गतीने होत आहे. यामुळे नागरिक हैराण आहेत. आता तर कामालाच तडे गेल्याने कामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. गटाराच्या कामाला चिरा पडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here