जामखेड येथील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. पांडुरंग सानप व केमिस्ट असलेले भास्कर भोरे हे दोन साहसवीर “सायकल रायडींग” अर्थात सायकल वरून प्रवास पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी तब्बल ४००० किलोमीटरचा प्रवासाचे ध्येय ठेवून काश्मीर ते कन्याकुमारी असा देशांच्या दोन टोकांचा प्रवास करत जनजागृती करत आहेत.
के 2 के म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी अशी त्यांची सायकल यात्रा असून दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता जामखेड शहरातील एच. यु. गुगळे पतसंस्थेपासून हिरवा झेंडा दाखवून या सायकल स्वरांना निरोप देण्यात आला होता.
डॉ. सानप यांनी आतापर्यंत आयर्न मॅन स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा एक तास आगोदर पुर्ण करत इतिहास रचला होता. तसेच दरवर्षी गडकिल्ल्यांवर सायकल वर जात आसतात. आता ते पर्यावरण रक्षणाचा व इंधन बचतीचा संदेश देणार आहेत.
दररोज सोशल मिडीयावर किती प्रवास केला कोठे आहेत हा संदेश देतात त्यांना मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा मिळत आहेत.