राज्यात 15 सप्टेंबरपासून जम्बो भरती, 78000 पदे भरणार

0
209

 

जामखेड न्युज——

सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये राज्यात जम्बो मेगाभरती होणार आहे. पोलिसांसह (Police Recruitment) तब्बल 78 हजार पदांची भरती होणार आहे. (Maharashtra Police Recruitment) पावसाळी अधिवेशनानंतर सरकारने हा प्लान तयार केलाय. त्यासंदर्भात काल सामान्य प्रशासन विभागाची बैठक झाली.

राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत (Maharashtra Police Recruitment ) मोठा निर्णय घेतला आहे. राज्य पोलीस दलात विविध पदांवर ही भरती भरती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गृहविभागातील 7 हजार पदांवरही 15 सप्टेंबरपासून भरती सुरु होणार आहे. पोलीस पदभरती – 7231, एमपीएससीमार्फत भरती 11,026, गट ‘ब, क व ड’ची पदभरती 60,000 होणार आहे. या भरतीला 15 सप्टेंबरनंतर सुरुवात होणार आहे. तर डिसेंबरनंतर 25 ते 50 हजार पदभरतीचा दुसरा टप्पा होणार आहे.

राज्य सरकारच्या एकूण 29 प्रमुख विभागाअंतर्गत तब्बल सव्वादोन लाख पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 100 टक्के पदांची पुढील दोन महिन्यांत भरती होणार आहे. डिसेंबरनंतर 25 ते 50 हजार पदभरतीचा दुसरा टप्पा जाहीर होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.

राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा दिवाळीत होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारकडून मेगाभरतीचे युध्दपातळीवर नियोजन सुरु आहे. कृषी, महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन, गृह, राज्य उत्पादन शुल्क, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास या विभागांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमधील रिक्तपदांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे डिसेंबरनंतर पदभरतीचा दुसरा टप्पा जाहीर होऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here