आमची दहशत कमी झाली काय? म्हणत तलवारीने वार तीघे जखमी

0
256
जामखेड न्युज——
शेतातील पिकामध्ये गेलेले जनावरे हाकलल्याचा राग धरून तिघांवर तलवार, लोखंडी गज, कत्तीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव कौंडा येथे घडली.
या हल्ल्यात ज्ञानदेव कुंडलिक बनकर, बाजीराव मारूती बनकर, अभिषेक बाजीराव बनकर (सर्व रा. पिंपळगाव कौंडा) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी ज्ञानदेव बनकर यांनी नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून रमेश सावत्या भोसले, तुषार सावत्या भोसले, अविनाश सावत्या भोसले (सर्व रा. पिंपळगाव कौंडा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानदेव, बाजीराव व अभिषेक त्यांच्या शेताच्या बांधावर असताना शेळ्या व जनावरे शेतातील तुरीचे व मुगाचे पिक खात असल्याने अभिषेकने शेळ्या व जनावरे शेताच्या बाहेर हाकलून दिले. रमेश भोसले याला त्याचा राग आल्याने त्याने तुषार व अविनाश यांना सांगितले.
त्यांनी तिघांनी हातात तलवार, लोखंडी गज, कत्ती घेऊन अभिषेक, ज्ञानदेव व बाजीराव यांना मारण्याचा उद्देशाने त्यांच्याकडे आले. तुम्ही आमचे शेळ्या व जनावरे हाकलता, काय आमची दहशत कमी झाली काय, असे म्हणत अभिषेक, ज्ञानदेव व बाजीराव यांना जीवे ठार मारण्याचा उद्देशाने तलवार, गज व कत्तीने हल्ला करून जखमी केले असल्याचे फिर्यादी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here