जामखेड तालुक्यातील पाटोदा, भवरवाडी, खामगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान

0
277
जामखेड प्रतिनिधी
              जामखेड न्युज – – – 
जामखेड तालुक्यातील पाटोदा, भवरवाडी व खामगाव परीसरात आज झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. शेतातील झाडे उन्मळून पडले असुन शेतीचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या घरांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी तातडीने त्या घरांचे पंचनामे करून मदत करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
 जामखेड शहरासह तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पाटोदा, भवरवाडी व खामगाव या भागात मोठय़ा प्रमाणात वादळी पावसाने नागरिकांची व शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. भवरवाडी याठिकाणी श्रीकांत पारवे, बाळु पारवे, कुंडल गायकवाड व देविदास काळे यांच्या घरांची पडझड होऊन यातील काही घरांचे पत्रे उडाल्याने संसार उघडय़ावर पडला आहे.
पाटोदा या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आण्णासाहेब गव्हाणे यांचे चिंचेचे झाड पडले तर दत्तात्रय कापसे यांच्या शेतातील लिंबोनीच्या बागातील झाडे उन्मळून पडले आहेत. तर नाना गव्हाणे यांच्या घराचे देखील नुकसान झाले आहे अशी माहिती पाटोदा येथील माजी सरपंच गफारभाई पठाण यांनी दिली. पाटोदा, भवरवाडी व खामगाव परीसरात अनेक ठिकाणी पावसाने बऱ्याच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तरी महसुल विभागाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनसह पाटोदा ग्रामपंचायत चे सदस्य दिनकर टापरे यांनी केले आहे.
जामखेड तालुक्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला असुन पाटोदा व भवरवाडी या ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काही घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुळे तातडीने ज्या घरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील अशी माहिती जामखेचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here