जामखेड न्युज – – – –
आम्ही शेतकरी आहोत. शेती करताना माझ्या वडिलांचे दोन वेळा खायचे वांदे होते त्यामुळे शेतकऱ्यांचे दु:ख काय असते हे मी सोसले आहे. त्यामुळे शेतकर्यांना कर्जाची गरज किती असते हे आम्ही जाणतो. शेतकर्यांच्या हितासाठी गावातील प्रमुख एकत्र आले आहेत. विरोधकांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायत कामासाठी लोकांना त्यांचे उंबरे झिजवावे लागते त्यातही पक्षीय राजकारण केले जाते. आमच्याकडे अशा गोष्टींना थारा राहणार नाही. कोणताही गटतट न पाहता शेतकरी केंद्रबिंदू मानून आम्ही कारभार करणार असल्याचे रोखठोक मत ज्योती क्रांती मल्टिस्टेट संस्थेचे अध्यक्ष आजीनाथ हजारे यांनी व्यक्त केले.
जवळा येथील सोसायटीच्या शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. या वेळी जवळा गावातुन प्रचार फेरी काढण्यात आली. गावातील मारुती मंदिर, खाकसार वली बाबा या देवस्थानाचे दर्शन घेऊन ही रॅली जवळेश्वर मंदिरासमोर आल्या नंतर त्या ठिकाणी भव्य अशी सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ज्योती क्रांती मल्टीस्टेट चे चेअरमन आजीनाथ हजारे हे बोलत होते. पुढे बोलताना चेअरमन अजिनाथ हजारे म्हणाले की मी माझ्या व्यवसायात अत्तापर्यंन्त एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याच प्रमाणे सोसायटीच्या माध्यमातून देखील शेतकर्यांना आर्थिक फायदा झाला पाहिजे. हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून गावातील सर्व जण एकत्र येऊन शेतकरी विकास आघाडी पॅनल उभा केला आहे. त्यामुळे भेदभाव बाजुला ठेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी विकास आघाडी पॅनलला निवडुन द्या असे आवाहन केले आहे.
यावेळी शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलचे डॉ. महादेव पवार, दशरथ हजारे, प्रशांत पाटील, राजेंद्र राऊत, डॉ. दिपक वाळुंजकर, अभय नाळे, बाबा महानवर यांनी भाषणे केली यावेळी आदीनाथ कारखान्याचे संचालक राजेंद्र पवार, माजी उपसभापती दिपक पाटील, दत्तात्रय कोल्हे, भिमराव हजारे, सत्तार शेख, सुखदेव मते, शहाजी पाटील, पांडुरंग वाळके, पोपट नाना शिंदे, महेंद्र खेत्रे, नवनाथ कोल्हे, पठाडे चेअरमन, हुसेनभाई, बबन ठकाण, पांडुरंग कोल्हे, मारुती रोडे, गैतम कोल्हे, उमेश रोडे, एकनाथ हजारे, राजेंद्र महाजन, संताराम सुळ, अशोक पठाडे, संजय अव्हाड, आलम शेख, आयुब शेख, रामलिंग बाप्पु, केशव हजारे, महंमद शेख, राजु महाजन व तेरा उमेदवार उपस्थितीत होते तसेच महीला प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.