Saturday, May 30, 2026
Home ताज्या बातम्या पुन्हा अतिक्रमणे, अस्ताव्यस्त वाहने पार्किंग, आणी नेहमीचीच वाहतूक कोंडी जामखेड...

पुन्हा अतिक्रमणे, अस्ताव्यस्त वाहने पार्किंग, आणी नेहमीचीच वाहतूक कोंडी जामखेड मध्ये चाललय काय?

0
2

जामखेड न्युज – – – – – 

पुन्हा अतिक्रमणे, अस्ताव्यस्त वाहने पार्किंग, आणी नेहमीचीच वाहतूक कोंडी

जामखेड मध्ये चाललय काय?

जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ (डी) अंतर्गत खर्डा चौक ते बीड कॉर्नर या भागातील अतिक्रमणे हटवून प्रलंबित रस्ता काम पूर्ण करण्यासाठी मंगळवार (दि. २६) सकाळी ९ वाजल्यापासून मोठा गाजावाजा करतजामखेड नगरपरिषद व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून संयुक्त मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती परंतु ही अतिक्रमण हटाव मोहीम गोरगरीब जनतेवर हाटोड्यासारखी पडली तर धनदांडग्यांच्या व शासकीय अतिक्रमणास अभय दाखविले जात असल्याचे जामखेड करामध्ये चर्चेला उधाण आले होते. अतिक्रमण हटाव मोहीमेचे जामखेड करांना फक्त गाजर दाखविले आहे यातगरीबांना उठ तर धनधाडग्यांना सुट यामुळे पुन्हा जामखेड करांची निराशा झाली होती. दोनच दिवसांत ज्यांच्या टपऱ्या उठवल्या होत्या त्यातील काही जणांनी परत आपापल्या जागेवर गाडे लावण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या लोकांचे अतिक्रमणे हटविल्याशिवाय आम्ही आता आमचे अतिक्रमण हटवितार नाही अशी भुमिका टपरी धारकांनी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडी दिसून आली.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामाला अखेर सुरुवात झाल्याने खऱ्या अर्थाने जामखेड करांना न्याय मिळेल असे वाटत होते पण या एक दिवशीय अतिक्रमण हटाव मोहीमेने फक्त गोरगरीब जनतेचे संसार मोडले तर मोठे अतिक्रमण धारक तसेच राहणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी अतिक्रमण हटविताना सर्वांना समान न्याय मिळावा, अशी मागणीही जोर धरली होती यानुसार दोनच दिवसानंतर पुन्हा अतिक्रमण टपऱ्या दिसू लागल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत होता. विशेषतः बीड कॉर्नर ते खर्डा चौक या भागातील अतिक्रमणांमुळे रस्ता रुंदीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते.या पार्श्वभूमीवर शहरातील प्रलंबित रस्ता काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अनेक बैठका घेतल्या होत्या.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान भवनात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत ३१ मे पूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे हद्दीतील सर्व अतिक्रमणे तातडीने हटवून रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.त्यानुसार मंगळवारी जामखेड नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग विभाग, भूमी अभिलेख, महावितरण, पोलिस प्रशासन तसेच संबंधित कंत्राटदाराचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. दोन दिवसात पुन्हा टपऱ्या दिसू लागल्या आहेत. तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेले वाहने यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येत आहे.

रस्त्यालगत असलेले हातगाडे, दुकानांचे शेड तसेच बेकायदेशीर टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यातं आल्या.मात्र, अतिक्रमण हटविताना प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा दुजाभाव करू नये, सर्वसामान्यांसोबतच धनदांडग्यांवरही समान कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून झाली होती. मोठ्या लोकांचे अतिक्रमणे निघत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या टपऱ्या हटविणार नाही अशी भूमिका टपरी धारकांनी घेतली आहे. यामुळे आता अतिक्रमणे निघणार का नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमण हटविण्यात आले असले तरी नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण कायम असल्याने लाईट पोल शिफ्ट करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पुढील रस्ता काम पुन्हा रखडून रस्ता जैसे थे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमणांवरही तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

चौकट
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधानभवनात बैठक घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने बीड कॉर्नर ते खर्डा चौक या १२० मीटर अंतरातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली, परंतु सभापती प्रा राम शिंदे यांच्या कडून जामखेड करांना न्याय मिळेल ही अपेक्षा होती पण तसे न होता फक्त गोरगरिबांचेच अतिक्रमण हटविण्यात आले आहे. मात्र वास्तव पाहता समर्थ हॉस्पिटल, बीड रोड ते बीड कॉर्नर या भागातील गटाच्या हद्दी निश्चित झाल्यानुसार तेथील अतिक्रमणांवर कारवाई होणे क्रमप्राप्त होते. तसे न झाल्याने परत एकदा धनदांडग्यांना वाचवून सर्वसामान्यांवर अन्याय झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.कारवाई होत असेल तर ती सर्वांसाठी समान असावी.नियम गरीबांसाठी वेगळे आणि श्रीमंतांसाठी वेगळे नसावेत. जामखेड करांना खऱ्या अर्थाने न्याय मिळविण्यासाठी पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अवधुत पवार यांनी दिला आहे.

चौकट
धनदांडग्यांना राजकीय शक्तीचे पाठबळ : जामखेडकर

खुप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जामखेडकरांना असे वाटले होते की पूर्ण अतिक्रमण निघणार. पण आज प्रशासनाची कार्यवाही पाहता, तात्पुरता दिखावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात दर वेळी प्रमाणे, यावेळी पण गोर-गरिबांवर हातोडा पडला आहे. हेच पाहायला मिळाले.
मूळ काँक्रिट, कायम झालेले अतिक्रमण कधी काढणार..?
हातावर पोट भरणारांणा किती दिवस बळी देणार..?
काही राजकीय अदृश्य शक्तीचे पाठबळ धनदांडग्यांना आहे का.?
असा जामखेड कराना प्रश्न पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!