जामखेड न्युज——
पाटोदा (गरड) मारहाण प्रकारणातील आरोपींना तत्काळ अटक करावी – सकल हिंदू समाज
चार दिवसांपूर्वी जामखेड तालुक्यातील पाटोदा गरड येथे अप्पासाहेब लक्ष्मण गव्हाणे यांना गावातील चार जणांनी लोखंडी रॉड व काठीने जबर मारहाण केली होती. यात गव्हाणे गंभीर जखमी झाले होते. मारहाण करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक असून गावात अवैध धंदे तसेच विनापरवाना शस्त्र याच बरोबर हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होईल असे उद्योग सुरू असतात तेव्हा मारहाण करणाऱ्या आरोपींना ताबडतोब अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सर्व ग्रामस्त व सकल हिंदू समाज, जामखेड तालुका यांच्या वतीने निवेदनाद्वारेकळवण्यात येते कि, श्री अप्पासाहेब लक्ष्मण गव्हाणे यांचे गावतील मालकीच्या शेतजमीन गट नं. ३२५ मध्ये ६ गुंठे जमीन असूनत्याच्या जागेवर १) गफार मुद्देखान पठाण, २)सामिर मुद्देखान पठाण यांनी अतिक्रमण करून त्या जागेवर वाँशिंग सेंटर करण्यासाठी बांधकाम केले आहे. सदर जागा हि अप्पासाहेब लक्ष्मण गव्हाणे यांचे मालकीची असून त्या जागेवर १) गफार मुद्देखान पठाण,२)सामिर मुद्देखान पठाण हे दोघे सदर जागा स्वतच्या मालकीची सांगून अतिक्रमण करू पाहत आहेत.
अतिक्रमण केलेल्या जागेवर बांधकाम केल्याचे पाहून श्री. अप्पासाहेब लक्ष्मण गव्हाणे हे त्या जागेवर गेले असता वरील दोषांनी तसेच त्यांचे समवेत १) मयुर तय्यब पठाण, २)तैशिक रज्जाक मुलाणी (शेख), ३)खुशीद तय्यब पठाण यांनी मिळून श्री अप्पासाहेब लक्ष्मण गव्हाणे यास लोखंडी रॉड व काठीने जबर मारहाण केली आहे.
यामध्ये त्याचे हाताचे हाड मोडले आहे. तसेच पायालाही जबर मारहाण करून दुखापत केली आहे. सदर आरोपी व त्याचे सहकारी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्याचा गावामध्ये दारूने अवैध धंदे आहेत. गफार मुद्देखान पठाण याच्याकडे विनापरवाना शस्त्र असून त्याचा वापर करून गावामध्ये सतत दहशत निर्माण करत असतो.
तसेच त्याने गावामध्ये ग्रामपंचायत जागेवर देखील अतिक्रमण केले आहे. आरोपी हा गावामध्ये सतत तेढ निर्माण होईल असे फलक लावून हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण करत असतो. तरी आपणास विनंती आहे कि, आरोपीवर गुन्हे दाखल होऊन अद्याप अटक झाली नाही.
वरील सर्व आरोपींना तत्काळ अटक करुन त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ व सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. असे निवेदन सकल हिंदू समाजाच्या देण्यात आले आहे.
सदर निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, नितेश राणे आमदार, पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.