जामखेड न्युज——
सुपा येथील अतिक्रमणे हटवले, जामखेड शहरातील अतिक्रमणाबाबत दुजाभाव का❓

सुप्यातील अतिक्रमनांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने बेधडक कारवाई केली. लोकसभा निवडणूक निकालापूर्वी अतिक्रमण हटावची कारवाई झाल्याने चर्चेचा विषय ठरला. शनिवार दि. २५ रोजी सुपा बसस्थानकापासून ते एमआयडीसी चौकापर्यंत अतिक्रमणे काढण्यात आली. काही ठिकाणी अतिक्रमणधारकांना ३० तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती. माजी आमदार नीलेश लंके यांचे पारनेर रस्त्यावर एमआयडीसी चौकात संपर्क कार्यालय होते. हे कार्यालय अतिक्रमणात असल्याने लंके यांच्या कार्यालयावर शनिवार दि.१ जून रोजी हातोडा टाकला. मात्र जामखेड शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात असून अडथळा ठरणारे गोरगरिबांचे अतिक्रमणे हटवले मात्र अडथळा ठरणाऱ्या मोठ मोठ्या इमारती याबाबत दुजाभाव केला जात आहे. यामुळे सुप्यातील अतिक्रमणे हटवले मात्र जामखेड मधील अतिक्रमणाबाबत दुजाभाव का? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत.

सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर शनिवार दि. २५ रोजी सकाळी ८ वाजता बांधकाम विभाग, चेतक एंटरप्रायजेस यांच्या वतीने अतिक्रमणावर आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. हि मोहीम सुरू असताना काही अतिक्रमण धारकांनी आम्हाला ३० तारखेपर्यंत मुदत देण्यात यावी अशी विनंती केली. या विनंतीला मान देत अतिक्रमण मोहीम थांबवण्यात आली होती. ३० तारखेचा दिलेला शेवटचा अल्टिमेटम संपल्यानंतर आज पुन्हा शनिवार दि.१ जून रोजी दुपारी २ वाजता मोठा फौजफाटा बसस्थानक परिसरात दाखल झाला. व राहिलेले अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आली.

यापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांची दुकाने, चहा सेंटर, चपलांची दुकाने, कपड्यांची दुकाने, मटन शॉप, पानटपरी, बाजार तळ समोरील अतिक्रमण, सुपा हाईट्स समोरील कंपाऊंड, तसेच शहाजापुर चौकात सुमारे पन्नास वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले मळगंगा देवीचे मंदिर अतिक्रमणात असल्याने तेही जमीन दोस्त करण्यात आले. तर औद्योगिक चौक ते नगर – पुणे महामार्ग अंतर्गत अतिक्रमणे देखील काढण्यात आली असून ही मोहीम दोन दिवस चालणार आहे.

अचानक आलेल्या या मोहिमेमुळे टपरीधारकांची एकच धांदल उडाली, जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणात असलेली बसस्थानक परिसरातील भिंत, टपर्या जमीनीच्या लेवलला नेल्या जात असल्याने टपरीधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सुपा – पारनेर रस्त्याने घेतला मोकळा श्वास
सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहतूकीचा नेहमी खोळंबा होत. बुधवारी बाजारच्या दिवशी वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली होती. याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. तर चोर्यांचे प्रमाण वाढले होते. हे सर्व अतिक्रमण काढण्यात आल्याने सुपा – पारनेर रस्त्याने प्रथमच मोकळा श्वास घेतला. उर्वरीत नगर- पुणे महामार्गावरील अतिक्रमणे उद्या रविवार दि. २ रोजी काढण्यात येणार असल्याचे माहिती अतिक्रमण मोहिमेद्वारे देण्यात आली.

जामखेड शहरातील अतिक्रमणे कधी हटवणार ?
जामखेड हे बीड, नगर, सोलापूर व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील शहर आहे त्यामुळे जामखेड शहराची बाजारपेठ अतिशय मोठी व नावाजलेली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 हा जामखेड शहरातून जातो त्या नगर बीड रस्त्यावरच बाजारपेठेतील बहुतांश व्यवसाय आहेत जामखेड शहर हे केवळ व्यापारावर अवलंबून असणारा शहर आहे शहरांमध्ये आर्थिक उत्पन्नाचा इतर कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही बाकी शहरांच्या तुलनेत जामखेडमध्ये औद्योगिक वसाहत, विद्यापीठ, कॉलेज, मोठ्या संस्था व इतर रोजगार उपलब्ध होणारा कोणताही स्त्रोत नाही केवळ फक्त व्यवसायावर अवलंबून असणारा हा आपला शहर आहे. यामुळे काही व्यापारी वर्गाने अतिक्रमण हटविण्यास विरोध केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग नियमावलीनुसार शंभर फुट आहे
50 फूट दोन्ही बाजूने जागा ताब्यात घेतली तर जामखेड मधील नगर-बीड रस्त्यावरील 80 ते 90 टक्के इमारतींना धोका निर्माण होत आहे. मात्र निवडणूक काळात या अतिक्रमण धारकांना सत्ताधारी पक्षाने दिलासा दिला आहे. कोणाचेही अतिक्रमण हटणार नाही आहे तसा रस्ता करण्यात येईल. त्यामुळे रस्ता कमी होत आहे. तेव्हा सुप्यातील अतिक्रमणे हटवले जामखेड शहरातील अतिक्रमणाबाबत दुजाभाव का? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत.





