सावधान!! भुतवडा येथे बिबट्याच्या हल्यात शेळी जखमी, मालकाने शेळीला सोडवले बिबट्याच्या तावडीतून

0
3284

जामखेड न्युज——

सावधान!! भुतवडा येथे बिबट्याच्या हल्यात शेळी जखमी,

मालकाने शेळीला सोडवले बिबट्याच्या तावडीतून

गेल्या पाच दिवसांपासून भुतवडा, सौताडा परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत आहे. अशोक दहिफळे यांच्या गाडीला गुरूवारी बिबट्या आडवा आला होता. काल सोमवारी सायंकाळी भुतवडा तलाव परिसरात लहू आश्रू डोंगरे यांच्या बकरीवर बिबट्याने हल्ला केला शेळीला घेऊन बिबट्या चालला असता शेळी मालक डोंगरे यांनी हातात दगड व काठीने बिबट्याचा पाठलाग करत शेळीला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. यात शेळी जखमी झाली आहे.

लहू डोंगरे हे भुतवडा परिसरात पडिक जमिनीत शेळ्या चारत असताना सायंकाळी पाचच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला केला व शेळीला बिबट्या घेऊन चालला हे शेळी मालक डोंगरे यांनी पाहिले व हातात दगड व काठी घेऊन बिबट्याच्या मागे लागले व शेळीला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. शेळीच्या नरड्याला चांगले दात लागले होते.

याची माहिती वनविभागास दिली वनविभिगाचे वनपाल भोसले व डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी शेळीचा पंचनामा केला व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांना बोलावले यांनी जखमी शेळीवर उपचार केले पंधरा टाके पडले आहेत. शेळीची अवस्था गंभीर आहे.

सौताडा, भुतवडा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. कधी वन्य प्राण्यांवर उपजीविका करतात पण वन्य प्राणी मिळाले नाहीत तर जंगलाच्या बाजूला चरत असलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


याबाबत वनपाल भोसले यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, शेळीवर बिबट्यानेच हल्ला केला आहे. सध्या शेळीची अवस्था गंभीर आहे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शेळीवर उपचार केले आहेत. तरी ग्रामस्थांनी सावध राहावे. आम्ही आज या परिसरात पिंजरा लावणार आहोत.

जामखेड तालुक्यातील जातेगाव, नायगाव, धामणगाव, मोहरी, दिघोळ परिसरात बिबट्या असल्याच्या बातम्या येत होत्या वनविभागाने अनेक वेळा पिंजरा लावूनही बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते. काही दिवसांपूर्वी धामणगाव येथे एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला होता. तर वीस दिवसांपूर्वी आरणगाव येथे एका विहिरीत बिबट्या सापडला होता.

 

चौकट

बिबट्या असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. अशोक दहिफळे यांनी प्रत्यक्षात बिबट्या पाहिला व व्हिडिओ चित्रण केले आहे. तरी नागरिकांनी अंधारात एकटे फिरू नये, बॅटरी बरोबर ठेवावी, मोबाईल वर गाणे लावावीत, शेळ्या, मेंढ्या, वासरे कुंपणाच्या आत ठेवावेत हातात नेहमी काठी असावी. आपल्या पशूंची काळजी घ्यावी.

मोहन शेळके
(कर्जत-जामखेड उपविभागीय वनाधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here