जामखेड न्युज——
कठ्ड्यावीना शेकडो अपघातात अनेकांचा जीव गमावलेल्या पोखरी पुलावर जामखेडचे उद्योजक आकाश बाफनातर्फे लोखंडी कठडे बसवण्यास सुरूवात स्पीड ब्रेकरही टाकणार
जामखेड पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नगर-जामखेड महामार्गावर बीड जिल्हा हद्दीत असलेल्या पोखरीपासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या अपघात प्रवण क्षेत्रातील पुलाला कठडे नसल्याने या ठिकाणी शेकडो अपघात झाल्याने अनेकांची जीव गेले आहेत. तर अनेक जण कायमचे अपंग झाल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अपघात रोखण्यासाठी बाफना उद्योग समूहाचे चेअरमन आकाश बाफना पुढे आले आहेत ते पदरमोड करून पुलावर लोखंडी कठडे बसवणार व स्पीड ब्रेकर टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
पोखरी येथील पुलावरील बॅरिगेटिंग कामाला सुरुवात केली यावेळी बाफना उद्योग समूहाचे चेअरमन आकाश बाफना, दिगंबर राऊत, बाळासाहेब नवसार, अशोक कुमटकर सह
इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कठडे नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे मात्र याकडे बांधकाम विभागाचे पुर्णतः दुर्लक्ष आहे. याबाबत दोनच दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात जामखेड येथील प्रसिध्द व्यापारी महेंद्र बोरा यांचा याच पुलाखाली गाडी जाऊन झालेल्या अपघातात त्यांचा जीव गेला तर घरातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या पुलाकडे कोणी लक्ष देत नसल्याने जामखेड येथील बाफना उद्योग समूहाचे चेअरमन आकाश बाफना यांनी पुढाकार घेत बाफना उद्योग समूहाच्या वतीने आकाश बाफना हे पुलावर लोखंडी कठडे व स्पीड ब्रेकर टाकणार असलेल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी दिली होती आज प्रत्येक्षात कामाला सुरुवात झाली आहे.
जामखेड नगर राष्ट्रीय महामार्गावरील कठडे नसलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू असून हा पूल जीवघेणा ठरत आहे. हा पूल वळण रस्त्यावर असून या ठिकाणी दिशादर्शक फलक किंवा गतिरोधक नाहीत पुलावर झाडे जास्त वाढलेली आहेत. रस्ता पुर्ण झाकुन जात आहे. रस्ता दिसत नसल्याने तसेच साईट पट्टया भरलेल्या नसल्याने मोठे अपघात होतात अनेक वाहने भरधाव जातात व अपघातांचे प्रमाण वाढत आहे.