Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या अभी नही तो कभी नही’ म्हणत एसटी संप कायम

अभी नही तो कभी नही’ म्हणत एसटी संप कायम

0
230
जामखेड न्युज – – – 
 गेली तीन महिने होऊनही एसटीचा संप संपत नसेल तर ते सरकारचे अपयश आहे. आता आणखी किती दिवस प्रवाशांनी गैरसोय सहन करायची, असा सवाल प्रवाशी करू लागले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी साधारण दिवाळीपासून कर्मचारी संपावर आहेत. यात चालक आणि वाहकांची संख्या अधिक असल्याने बसेस ठप्प आहेत.
सरकारने कर्मचाऱ्यांना परागवाढीचे आमिष दाखविले. निलंबन, बडतर्फी अशी कारवाईही सुरू केली, तरीही कर्मचारी कामावर यायला तयार नाहीत. जे कर्मचारी संपावर आहेत त्यांना तीन महिन्यांपासून वेतन बंद आहे. त्यामुळे त्यांच्या घरचे आर्थिक गणित बिघडले आहे. मात्र, ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत त्यांनी संप कायम ठेवला आहे. प्रशासनाच्या आवाहनानुसार काही कर्मचारी कामावर परतले. त्यामुळे ते कर्मचारी, निवृत्त तसेच खासगी चालक यांच्या साह्याने महामंड‌ळाने काही फेऱ्या सुरू केल्या. तरीही पूर्ण क्षमतेने बसेस सुरू झाल्या नाहीत. परिणामी प्रवाशांना खासगी बसेस तसेच अन्य साधनांनी प्रवास करावा लागत आहे.
आता शाळा, महाविद्यालयेही पूर्णपणे सुरू झाले आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना एसटी हेच प्रमुख साधन आहे. मात्र संपामुळे विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. आधीच करोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता एसटीच्या संपाची भर पडली आहे. हे असे किती दिवस चालणार असा प्रवाशांचा सवाल आहे. दरम्यान, बुधवारी नागपूर विभागात ७२ बसेसनी २०४ फेऱ्या केल्या. त्याद्वारे महामंडळाला साधारण आठ लाख रुपयांचे उत्पन्न झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!