जामखेड न्युज – – –
राज्य परिवहन महामंडळ चे (MSRTC) कर्मचारी संपावर आहे त्यामुळे थांबलेली प्रवासी वाहतूक पूर्व पदावर आणण्यासाठी एसटीचे स्टेरिंग ग्रह रक्षक दलाच्या हाती द्या.
त्या साठी राज्यभरात (Maharastra) चार हजार जवान तयार आहेत .
अशी मागणी होमगार्ड विकास समिती आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे करणार आहेत .संपावर असलेल्या राज्य परिवहन महामंडळ कर्मचारा सोबत सोमवारी दोन घटना घडल्या आहे . दोन महिन्या पासून सुरु असलेल्या एसटी कामगारांना संप मुंबई कामगार न्यायलयाने बेकायदा ठरविला आहे तर दुसरीकडे राज्यातील होमगार्ड विकास समितीने एसटी चे स्टेरिंग आम्हला द्या आम्ही बस चालवितो अशी मागणी केली आहे
ADVERTISEMENT 

.विविध संघटना नि माघार घेतली त्या नतर हि कामगार कामावर परतत नाही .तर काही कामगार परतले देखील आहे त्यामुळे काही प्रमाणात का होईना रुस्त्यावर एस टी बस पळू लागली अधिकारी देखील कर्मचाराचे घरी जाऊन त्यांना कामावर हजर राहण्यास सांगत आहे .आता कामगार काय भूमिका घेतात सर्वाचे लक्ष आहे ,एस टी महामंडळ चे कामगार शासनात विलीनीकरण व वेतनवाढ करावी या मागणीसाठी चालक आणि वाहक संपावर आहेत .संप मीटे पर्यंत प्रवसाच्या सोयी होण्यासाठी व राज्य शासनाला मदत करण्यासाठी ग्रह रक्षक दल तयार आहेत असे विकास समितीने म्हंटले आहे राज्याच्या ग्रह रक्षक दल महासंमादेश्कानी आदेश काढल्यास चार हजार जवान एसटी चाविण्यास तयार आहेत या जवानाकडे अवजड गाड्या चालविण्याचा परवाना देखील आहे .
देशात व राज्यात सरकारी कर्मचारीनि संप पुकरला तर ग्रह रक्षक दल त्या जागी नेमणूक करावी अशी तरतूद राज्याच्या होम गार्ड अधीनियम मध्ये आहे . त्यामुळे आमचे कर्तव्य समजून राज्य शासनाला मदत म्हणून एसटी महामंडळ च्या बस आम्ही चालवयाला तयार आहोत त्या साठी शासनांनी आदेश काढावा . याची आम्ही वाट पाहत आहोत
नाशिक शहर व जिल्ह्य़ात 80 तसेच राज्यात चार हजार ग्रह रक्षक दल जवानाकडे अवजड वाहतूक परवाना आहे . राज्याकडून आदेश आल्यास आम्ही त्वरित हजर होऊ या मागणीसाठी ग्रहमंत्री , परिवहन मंत्री व महासमादेशाकानी निवेदन पाठविणार आहोत .
नितीन गुणवंत अध्यक्ष होमगार्ड विकास कार्य समिती









