बीडीओच्या चौकशी समितीच्या आश्वासनानंतर शिऊर ग्रामस्थांचे उपोषण मागे

0
225
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – – 
    जामखेड तालुक्यातील शिऊर ग्रामपंचायत अंतर्गत सन २०१९ ते २०२१ या या दरम्यान दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांच्या चौकशीसाठी शिऊर ग्रामस्थांनी केलेल्या चौकशीच्या मागणीवरून गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी याबाबत दोन सदस्यीय समिती नेमून शासनाच्या दलितवस्ती योजनेच्या सर्व निकषांनुसार  १५ दिवसात चौकशी समीतीने अहवाल सादर अहवालानुसार चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्यामुळे तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते हे उपोषण मागे घेण्यात आले.
 यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. अरूण जाधव, भीम टोला संघटनेचे बापूसाहेब गायकवाड, बांधकाम आधिकारी माने, प्रहार संघटनेचे नयुम शेख, जयसिंग उगले, ॲड. बाळासाहेब घोडेस्वार, राजेंद्र सदाफुले आदी मान्यवर उपस्थित  होते.
     याबाबत सविस्तर असे की जामखेड तालुक्यातील शिऊर ग्रामपंचायत अंतर्गत सन २०१९ ते २०२१ या या दरम्यान दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्ता, पाणीपुरवठ, एलइडी बल्ब यासाठी १७ लाख रूपये निधी आला होता. परंतु सदर निधी दलितवस्तीमध्ये कुठेही खर्च केलेला आढळून आलेला नाही. व त्या निधीचे बिल देखील निघालेले आहे. ही बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. यामुळे शिऊर ग्रामस्थांनी या बाबत चौकशी होऊन कडक कारवाई व्हावी यासाठी जामखेड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्यानुसार  सदर निधीचे पैसे तत्कालीन ग्रामसेवक यांनी परस्पर बोगस बिले दाखवुन हडप केले व आम्हा दलित समाजाला विकासापासून वंचित ठेवले असून संबंधित ग्रामसेवकाने आमच्यावर एक प्रकारे अन्याय केला आहे. तरी संबंधित ग्रामसेवकाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, शिऊर ग्रामस्थ व दलित समाज यांनी दि .१३ डिसेंबर २०२१ रोजी  तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरू केले होते.
त्यानुसार जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी याबाबत दोन सदस्यीय समिती नेमून शासनाच्या दलितवस्ती योजनेच्या सर्व निकषांनुसार १५ दिवसात चौकशी समीतीने अहवाल सादर अहवालानुसार चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्यामुळे तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते हे उपोषण मागे घेण्यात आले.
 दि. १३ डिसेंबर रोजी केलेल्या अमरण उपोषण अंदोलनात सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, मनिष घायतडक, पांडूरंग समुद्र, शिवाजी समुद्र, लक्ष्मण पुलावळे, सोपान रिटे, गुलाब समुद्र, काळू समुद्र, राहुल समुद्र, अनसाबाई वाल्हेकर, सुनिता रिटे, शकुंतला रिटे, पुष्पा भगवान समुद्र, सुनिता दिपक समुद्र, शिला पांडूरंग समुद्र, दिपक पुलावळे, आदी नागरिक यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here