जामखेड महावितरण म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा, लाईट गुलच्या समस्येने जनता त्रस्त अधिकारी मात्र सुस्तच
संपूर्ण उन्हाळा गेला त्यावेळी महावितरणने झोपा काढल्या आणी आता पाऊस सुरू झाल्यावर दुरूस्ती चे काम हाती घेत अनेक भागात दिवस दिवस रात्र रात्र बत्ती गुल असते. त्यातच काही भागात सतत प्युज जाणे हे प्रकार सतत घडत आहेत. बत्ती गुलच्या समस्येने जामखेडकर हैराण झाले आहेत. तरीही महावितरणला कसलाही घाम फुटत नाही. जामखेड महावितरण म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. लाईट गुलच्या समस्येने जनता त्रस्त झालेली आहे अधिकारी मात्र सुस्तच आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. लाईट किंवा एखाद्या परिसरातील फ्युज गेली तर अधिकारी फोन घेत नाहीत. कधी कधी तर कार्यालयात कोणीच नसते. बत्ती गुल मात्र अधिकारी कार्यालयात नसताना पगार मात्र फुल्ल अशी अवस्था आहे. नागरिकांना कधी कधी रात्रभर उकाड्यात राहावे लागते. कधी दिवस दिवस लाईट नसते. यामुळे जामखेड कर हैराण झाले आहेत. अधिकारी कार्यालयात नसतात, फोन उचलत नाहीत. यामुळे जामखेड महावितरण कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोंळबा अशी स्थिती आहे.
अनेक दिवसांपासून जामखेड शहरासह मिलिंदनगर, सदाफुले वस्ती, शिवाजीनगर भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. कमी दाबाने वीजपुरवठा अचानक उच्च दाबाने वीजपुरवठा यामुळे इलेट्रिक उपकरणे नादुरुस्त होणे, सतत फ्युज उडणे यामुळे मे महिन्यातसंतप्त झालेल्या मिलिंदनगर भागातील शेकडो महिला, मुले यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. पण कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नव्हते सुमारे दोन तास महिलांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. महावितरणचे अधिकारी मात्र नाँट रिचेबल होते.
जामखेड शहरासह अनेक दिवसांपासून मिलिंदनगर, सदाफुले वस्ती व शिवाजीनगर, मार्केट यार्ड भागात वीचेचा सतत लपंडाव सुरू असतो. पावसाळ्यात विंचू काटा यामुळे लाईट आवश्यक आहे पण रात्र रात्र व दिवस दिवस लाईट नसते. यामुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. लाईट नेहमीच गुल पगार मात्र फुल्ल अशी अवस्था महावितरणच्या कार्यालयाची झालेली आहे.
महावितरण कडून अव्वाच्या सव्वा बील वसुल केले जाते पण सेवा मात्र मिळत नाही. फ्युज गेली तर लवकर टाकली जात नाही. लाईट जाणार आहे याची सूचना दिली जात नाही. तसेच अधिकारी फोन उचलत नाहीत यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
चौकट
सध्या जामखेड साठी दोन आमदार आहेत. आमदार रोहित पवार, आमदार प्रा. राम शिंदे व नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी लक्ष घालून महावितरण अधिकारी व कर्मचारी यांना योग्य सूचना देण्यात याव्यात अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.