सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

0
191
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
सरपंच परिषद मुंबईच्या एका १४ सदस्यीय शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सोमवारी (दि २८ जून) भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
   पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून गावाचा विकास होण्यासाठी उपलब्ध निधी केवळ विकास व पायाभूत सुविधा यांवर खर्च करण्यात यावा, मुंबई येथे सरपंच भवनाची निर्मिती करण्यात यावी तसेच करोनामुळे निधन झालेल्या राज्यातील ३५ पेक्षा अधिक सरपंचांच्या कुटुबिंयाना आर्थिक मदत देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
यावेळी सरपंच परिषद मुंबईचे विश्वस्त अविनाश आव्हाड, राजाराम पोतनिस, आनंद जाधव तसेच अश्विनीताई थोरात यांसह सहा महिला सरपंच देखिल उपस्थित होते. सरपंच परिषद मुंबईचे प्रदेश सरचिटणीस अॅड  विकास जाधव,किसन जाधव अविनाश आव्हाड,तसेच आरुणभाऊ
कापसे, संजय जगदाळे ,शत्रुघ्न धनवडे ,विठाबाई वनवे वनिताताई सुरवसे, अनिकेत घाडगे अंजलीताई ढेपे, मनीषाताई यादव यांसह सरपंच उपस्थित होते.
    जामखेड तालुक्यातून महारुळी – गुरेवाडीच्या सरपंच अंजलीताई ढेपे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here