जामखेड न्युज——–
ठेकेदाराच्या दिरंगाई मुळे रस्त्यावरील धुळीने जामखेड करांचे आरोग्य धोक्यात, निकृष्ट कामाच्या अनेक तक्रारी
ठेकेदाराविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा
जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्ग भूमीपूजन करण्याच्या आगोदरच आठ महिने रस्ता उकलून कामाला सुरुवात केली नंतर फेब्रुवारी महिन्यात भूमीपूजन झाले रस्ता खोदला त्यावर मातीमिश्रीत मुरूम टाकला यामुळे पावसाळ्यात चिखल व उन्हाळ्यात फुपाटा सगळीकडे फक्त धुळीचे लोट चे लोट दिसत आहेत. शहरातील व्यावसायिक नागरिक धुळीने हैराण झाले आहेत. शहरातील नागरिकांचे धुळीने आरोग्य धोक्यात आले आहे हे फक्त ठेकेदाराच्या दिरंगाई मुळे घडत आहे. ठेकेदाराने जामखेड करांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये लवकरच ठेकेदाराविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा काही नागरिकांनी जामखेड न्युजशी बोलताना दिला आहे.
सध्या बीड रोडवर काही प्रमाणात पहिल्या थराचे काम तर पंचदेवालय ते विंचरणा नदीपर्यंत पहिल्या थराचे काम झाले आहे तेही काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. त्या कामावर नीट पाणी मारलेले नाही सिमेंटची माती झालेली आहे रस्ता हाताने उकरत आहे. तसेच अनेक ठिकाणी गटाराचे काम सुरू आहे. सलग काम तर होतेच नाही गटाराचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. गटारावरील स्लॅप जेवढ्या इंच जाडीचा हवा तेवढ्या इंच जाडीचा अनेक ठिकाणी नाही तसेच त्यावर पाणीही मारलेले नाही.
जामखेड साठी दोन आमदार असतानाही शहरात सह नगर रोड व बीड रस्त्याची अत्यंत दुरावस्था आहे. यामुळे दररोज अनेक अपघात होत आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळ, रस्त्यावरील खड्डे यामुळे चिंचपूर ते जामखेड व जामखेड ते सौताडा रस्त्याची खुपच दुर्दशा झाली आहे. यामुळे अनेक लोक जामखेड सोडून नगर पुण्याला स्थलांतरित होऊ लागले आहेत. ठेकेदाराने ताबडतोब रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे. लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
चिंचपूर ते जामखेड व जामखेड पंचदेवालय ते सौताडा या रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. एका वर्षापासून काम सुरू आहे रस्ता खोदून ठेवला आहे. त्यावर मातीमिश्रीत मुरूम यामुळे पावसाळ्यात चिखल दलदल, तर पाऊस उघडला कि, धुळच धुळ तसेच खड्डे यामुळे जामखेड परिसरातील नागरिक वाहनधारक हैराण झाले आहेत. अनेक जण तर जामखेड म्हटले तरी नको रे बाबा असे म्हणतात. एक वर्ष झाले तरी राष्ट्रीय महामार्ग कामाची गती नाही. शहरात अद्याप तशीच परिस्थिती आहे. सध्या धुळीने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अनेक लोक जामखेड वगळून दुसऱ्या मार्गाची निवड करत आहेत तर अनेक प्रतिष्ठित नागरीक जामखेड शहर सोडून नगर पुण्याला स्थायीक होऊ लागले आहेत. त्यामुळे ताबडतोब रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा व नागरिकांचे स्थलांतर थांबवावे अशी मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यातून जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी. रस्ता १५७.६२ कोटी रुपयांचा रस्ता ठेकेदार ईपीसी कंत्राटदार, धनेश्वर कन्स्ट्रक्शन, गणेश कन्स्ट्रक्शन या तीन ठेकेदारांनी ८६.०९ कोटी रुपयांना काम घेतले आहे. या कामाचे भूमीपूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा राम शिंदे यांनी दि. २४ फेब्रुवारी २४ रोजी केले आहे. अठरा महिन्यात काम करण्याचा कालावधी आहे आठ महिने झाले तरी फक्त रस्ता खोदून माती मिश्रीत मुरूम टाकल्याने सध्या अनेक गाड्या घसरत आहेत. मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. शहरातील अतिक्रमणे तशीच आहेत. लहान लहान टपरी धारकांनी आपापले अतिक्रमण काढले पण शहरातील मोठ मोठे अतिक्रमण तसेच आहेत कामाची गती खुपच संत गतीने होत आहे. यामुळे नागरिक हैराण आहेत.
याबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही.