शासनाने लवकरात लवकर पोलीस पाटील भरती करावी – सरपंच निलेश पवार

0
273

 

जामखेड न्युज——

शासनाने लवकरात लवकर पोलीस पाटील भरती करावी – सरपंच निलेश पवार

 

सहा महिन्यापुर्वी पोलीस पाटील भरती होणार म्हणून शासनाने कर्जत तालुक्यातील ६६ व जामखेड तालुक्यातील ४८ अशा ११४ गावांचे आरक्षण जाहीर केले होते यानुसार सर्व प्रकिया पार पाडून एप्रिल महिन्यात पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार होती पण अद्याप कसलीही हालचाल दिसत नाही तेव्हा ताबडतोब पोलीस पाटील भरती करावी अशी विनंती बावीचे सरपंच निलेश पवार यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर करून सहा महीने उलटून गेले तरी पोलीस पाटील भरती का करण्यात आली. नाही याची माहिती मिळावी ही विनंती बावी गावचे सरपंच निलेश पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


त्यावेळी जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले लवकरात लवकर नियुक्ती करण्यात येईल.

 

 

जामखेड तालुक्यात 48 व कर्जत मधील 66 एकूण उपविभागात 114 गावामध्ये पोलीस पाटील पदभारती होणार होती. १३ मार्च ला जाहिरात प्रसिद्ध होणार होती पण अद्यापही प्रसिद्ध झालेली नाही. तेव्हा लवकरात लवकर पोलीस पाटील भरती करावी अशी मागणी सरपंच निलेश पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here