जोपर्यंत मदारी वसाहतीचे काम सुरू होत नाही तोपर्यंत जामखेड तालुक्यात कोणत्याही मंत्र्यांला पाय ठेवू देणार नाही. -ॲड. डॉ. अरुण जाधव भटकेमुक्त दिनानिमित्त अर्धनग्न आंदोलन

0
291
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाज बांधवांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत मंजूर झालेल्या मदारी वसाहतीचे बांधकाम प्रत्यक्षपणे जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत जामखेड तालुक्यात कुठल्याही मंत्र्याला फिरू देणार नाही. असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे  भटके-विमुक्तांचे राज्य समन्वयक ॲड.डॉ.अरुण जाधव यांनी दिला.
     जामखेड तालुक्यातील खर्डा येथे गेल्या 200 वर्षापासून वास्तव्य असलेल्या मदारी समाज बांधवांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मदारी वसाहतीचे बांधकाम सुरू करावे या मागणीसाठी जामखेड शहरातील खर्डा चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भटके मुक्त आघाडीचे राज्य समन्वयक ॲड.डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक 31 ऑगस्ट या भटके-मुक्त दिनानिमित्त अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
       खर्डा येथील मदारी समाजाचे प्रतिनिधी सलीम मदारी, मुस्तफा मदारी, कबीर मदारी, रवींद्र शिरसाट, फकीरा मदारी, सागर ससाने, हुसेन मदारी, रहीम मदारी, फकीर मदारी, मोहम्मद मदारी, असलम मदारी, सिकंदर मदारी, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष आतिश पारवे, शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे, वैजनाथ केसकर, संतोष चव्हाण, विशाल पवार, द्वारका पवार, तुकाराम पवार, बापू ओहोळ आणि अरुण डोळस आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
       सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सुमारे दोन तास खर्डा चौकातील वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार व ग्रामसेवक सातपुते त्यांनी पंचायत समितीच्या वतीने आणलेले पत्र स्वीकारण्यास   ॲड. डॉ अरुण जाधव यांनी स्पष्ट नकार दिला. प्रशासनाने प्रत्यक्ष काम सुरू न करता पत्राद्वारे केवळ आश्वासन देणे म्हणजेच आंदोलन कार्यकर्ते व मदारी समाज बांधवांना झुंलवत ठेवणे होय असे मत सलीम मदारी यांनी व्यक्त केले. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, बजरंग सरडे, मुस्लिम पंच कमिटी सदस्य अजहर काजी, इस्माईल टेलर, ह.भ.प गाडे महाराज यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
       यावेळी बोलताना ॲड.डॉ अरुण जाधव म्हणाले खर्डा येथील मदारी मेहतर समाजाचे वंशज गेल्या साठ वर्षापासून खर्डा बाजार तळातील बाजाराच्या ओट्यावर पाल टाकून राहतात. जामखेड तालुक्याला दोन आमदार एक खासदार असे तीन लोकप्रतिनिधी असून देखील मदारी वसाहतीचा प्रश्न पाच वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तो पर्यंत वंचित बहुजन आघाडी आपले आंदोलन सुरूच ठेवीन. गुरुवार दिनांक १ सप्टेंबर पासून पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात मदारी समाज बांधवासह वंचित बहुजन आघाडीचे कार्येकर्ते धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या दरम्यान कुठल्याही कार्यकर्ता किंवा मदारी समाज बांधवांना काहीही झाले तरी तीनही लोकप्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
       या आंदोलना दरम्यान खर्डा चौकात प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अजहरभाई काजी, आम आदमी आदमी पार्टीचे बजरंग सरडे, संतोष नवलाखा, म. न. से चे प्रदीप टापरे, लोक अधिकार आंदोलन प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, संतोष चव्हाण सलीम मदारी यांची भाषणे झाली.  यांनी प्रास्ताविक केले, संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, अरुण डोळस यांनी आभार मानले. या आंदोलनात भीमराव सुरवसे, लाला वाळके, सुग्रीव मोरे, अरुण चव्हाण, संतोष शेगर, मोहन शिंदे, बारीकराव लोंढे, सोनू राखपसरे, अशोक वाल्हेकर, कबीर मदारी, रवींद्र सिरसाट आदी कार्येकर्ते  सहभागी झालेहोते.
या आंदोलनासाठी सचिन भिंगारदिवे, अतुल ढोणे, राजू शिंदे, संतोष चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here