जामखेड न्युज – – – – –
अंतर्ज्ञान जागृतीतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय
जामखेड येथे सुपर सेंन्स ॲक्टिव्हेशन बॅचला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात

जामखेड शहरातील विकासनगर परिसरात नुकतीच सुपर सेंन्स ॲक्टिव्हेशन या वैशिष्ट्यपूर्ण प्रशिक्षण बॅचचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या बॅचमध्ये एकूण आठ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. लहान वयातच विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना जागृत करून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मानवी जीवनात अंतर्ज्ञान म्हणजे योग्य क्षणी योग्य विचार करण्याची अद्भुत आणि नैसर्गिक क्षमता होय. प्रत्येक बालकाच्या अंतरंगात दडलेल्या या विलक्षण शक्तीला योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि सकारात्मक वातावरण मिळाल्यास ती अधिक विकसित होऊ शकते. याच संकल्पनेवर आधारित या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मनाची एकाग्रता, आत्मविश्वास, सर्जनशीलता, निरीक्षणशक्ती आणि संवादकौशल्य विकसित करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी विशेष लाभदायी
तज्ज्ञांच्या मते पाच ते पंधरा वर्षे हा बालकांच्या मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकासाचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात मेंदूची ग्रहणशक्ती अधिक तीव्र असते. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होतो.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुढील सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते :
🔹 अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते.
🔹 स्मरणशक्ती अधिक प्रभावी बनते.
🔹 आत्मविश्वास दृढ होतो.
🔹 निर्णयक्षमता विकसित होते.
🔹 सर्जनशील विचारांना चालना मिळते.
🔹 संवादकौशल्य अधिक प्रभावी बनते.
🔹 शैक्षणिक प्रगतीमध्ये सकारात्मक वाढ दिसून येते.
🔹 सामाजिक व कौटुंबिक संबंध अधिक सुदृढ होतात.
🔹 सुप्त गुण, कला व प्रतिभांचा विकास होतो.
🔹 विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.
प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांची क्षमता पालकांसमोर सादर-
सदर प्रशिक्षणाचे प्रमुख मार्गदर्शक सुरेश कुमार गर्जे सर यांनी विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम करून घेतले. प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचे प्रात्यक्षिक त्वरित सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या एकाग्रतेचे, आत्मविश्वासाचे आणि अंतर्ज्ञान जागृतीचे दर्शन घडताच उपस्थित पालकांनी आश्चर्य आणि समाधान व्यक्त केले.
यावेळी सुरेशकुमार गर्जे सर यांनी पालकांना या प्रशिक्षणाचे दीर्घकालीन फायदे सविस्तरपणे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे प्रशिक्षण कशाप्रकारे उपयुक्त ठरते, याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्या – संतोष गर्जे सर
या प्रसंगी प्रकल्प समन्वयक संतोष गर्जे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना संबोधित करताना सांगितले की, “प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अमर्याद क्षमता दडलेली आहे. योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या साहाय्याने ही क्षमता उजागर होऊ शकते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण करून त्याचा आपल्या भावी आयुष्यात उपयोग करून घ्यावा.”
तसेच आगामी काळात अधिक व्यापक स्वरूपात प्रशिक्षण बॅचेस आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ते सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


