जामखेड न्युज – – – – –
जामखेड तालुक्यातील बावी येथे वादळी वाऱ्याचा कहर – तीन गायी मृत्युमुखी, फळबागांचे प्रचंड नुकसान
सोसाट्याच्या वाऱ्याने शेकडो झाडे उन्मळून पडली; वीजपुरवठा खंडित
जामखेड तालुक्यातील बावी गाव व परिसरात शुक्रवारी दुपारी आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. वादळामुळे वीज पडून लाईटचा करंट गायीच्या शेडमध्ये उतरला यात तीन गायी जागीच मृत्यूमुखी पडल्या तर मालक थोडक्यात बचावले त्यांनाही जोरदार करंट बसला शेकडो झाडे उन्मळून पडल्याने लिंबोणीच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

तालुक्यातील बावी येथील पवन जाधव यांच्या शेडमध्ये वादळामुळे वीज पडली वीजेचा करंट उतरला यात तीन गायी मृत्यूमुखी पडल्या तसेच पवन जाधव यांना जोरदार वीजेचा करंट बसला तेही चक्कर येऊन पडले तोंडातून रक्त आले. शेजारच्या लोकांनी त्यांना ताबडतोब दवाखान्यात दाखल केले. सध्या त्यांची तब्येत धोक्याबाहेर आहे धोका टळला आहे.

तसेच वादळामुळे परिसरातील लिंबोणीच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झाडे उन्मळून पडले आहेत. सचिन मुरूमकर, बयाजी पवार,
दत्ता कारंडे, अभिमान पवार, मधुकर पवार यांच्या बागेचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या व्यथा
शेतकरी सचिन मुरूमकर म्हणाले, “१० वर्षे मेहनत करून लिंबोणीची बाग उभी केली. १० मिनिटांच्या वादळात सगळी झाडे उन्मळून पडली. लाखो रुपयांचे कर्ज कसे फेडणार?”

हवामान विभागाचा इशारा
पुढील २ दिवस अहिल्यानगर जिल्ह्याला वादळी वारा व विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी फळबागांना आधार द्यावा, काढणीला आलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.






