गायरान अतिक्रमण धारकाचा संसार उघड्यावर पडू देणार नाही – ॲड.डॉ.अरुण जाधव

0
205

 

जामखेड न्युज——

गायरान अतिक्रमण धारकाचा संसार उघड्यावर पडू देणार नाही – ॲड.डॉ.अरुण जाधव

मा. उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेशानुसार सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमणे संदर्भाने गायरान धारक आणि निवासी भोगवटा यांच्या बाजूने मा.ॲंड. डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून अतिक्रमण धारकांच्या वेदना शासन दरबारी मांडण्यात आल्या यावेळी बोलताना ॲड.डॉ.अरुण जाधव म्हणाले की. कोणत्याही परिस्थितीत गोरगरीब लोकांना बेघर होऊ देणार नाही वेळप्रसंगी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून गायरान अतिक्रमण धारकांबरोबर राहिल असे सांगितले. 

या जन आक्रोश मोर्चात अनेक,संस्था, संघटना, मंडळे सहभागी झाले होते,यावेळी प्रहार संघटनेचे लेंढे पाटिल, लोकअधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अतिश पारवे, शहर प्रमुख आजिनाथ शिंदे, विशाल पवार, अरुण डोळस, भिमराव चव्हाण, भगवान गायकवाड, अंकुश पवार, घोडेश्वर मेजर, भीमराव सुरवसे, सोनेगावचे सरपंच पद्माकर बिरंगळ, सुरेश पवार,मोहन देवकाते, साधना पवार, दीपक साळवे, लखन मिसाळ, विलास मिसाळ,विकास बिरंगळ, पप्पू शिरगिरे, फकीर शेख, दादा फौजी, मीना गायवळ सचिन भिंगारदिवे, संतोष चव्हाण सर, वैजीनाथ केसकर, राजू शिंदे ,संतोष चव्हाण सोनेगाव, अतुल ढोणे, ऋषिकेश गायकवाड आदी उपस्थित होते
सरकारी गायरान जमिनीवर मिळालेल्या मालकी हक्कामुळे अनेक दलित, आदिवासी, भटके विमुक्त, भूमीहीन, शेतमजूर, गोरगरीब, कष्टकरी या गायरान जमिनीवर घरे उभे केली व त्या जमिनीमध्ये पिके घेऊन व स्वतःची उपजीविका भागवत आहेत, तसेच सरकारी जागेवर निवासी प्रयोजनासाठी केलेल्या अतिक्रमण धारक महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या मिळालेल्या घरकुलाचाही उपभोग घेत आहेत, सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांना या जमिनी व्यतिरिक्त जगण्यासाठी कोणतेही ठोस साधन नाही, तसेच सरकारी जागेवर घर बांधून राहत असलेल्या परिवारांना ही या जागे व्यतिरिक्त राहण्यासाठी कोणतीही जागा नाही महाराष्ट्रातील शेती प्रयोजनासाठी जमीन विहित केलेली गायरान धारक आणि सरकारी जागेवर घरे बांधून राहत असलेले निवासी भोगवटादार यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. 

या अतिक्रमण धारक जनतेने ऊस तोडून, वीटभट्टी कामावर जाऊन मोलमजुरी करून कुटुंबाला निवारा मिळावा म्हणून परिस्थितीनुसार निवारा उभा केला आहे, तो मा.उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार पाडण्यात येणार आहेत असे अतिक्रमण लाभधारक जनतेस प्रशासनाकडून नोटीस दिल्यानंतर अतिक्रमण गायरान लाभधारक जनता चिंतेत पडली आहे,हि लोकं रात्रंदिवस विचार करू लागले आहे माता-भगिनींच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले कोणी तर जेवण बंद केले आहे, असा धसक्का जनतेला बसला आहे. 

या गोरगरीब कष्टकरी, दलित आदिवासी जनतेचा प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी गायरानअतिक्रमण जनतेच्या वतीने ॲड डॉ अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे. 

महाराष्ट्र सरकारने या अतिक्रमणधारकांच्या बाजूने रिट पिटीशन याचीका सुप्रीम कोर्टात दाखल करावी हे सांगण्यात आले आहे यासाठी आज तहसील कार्यालयावरती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here